TechRepublic Blogs

Saturday, March 29, 2025

जगावं कसं ?

 *🙏🏻नेमकं जगावं कसं ?  तर शाळेतल्या एखाद्या शिक्षकासारखं...!* 


*तासन् तास उभं राहून शिकवायची लाज नाही आणि राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही मी घडवलय याचा माज नाही....!* 


*अख्खा वर्ग मुलांनी भरलेला असतो; परंतु त्यातल एकही मूल   आपलं नाही... आपण फक्त शिकण्यास प्रवृत्त करणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची...!*


*निकालासाठी एखाद्या वेळी दुसऱ्यांशी वाद होणारच.... परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं मानून दुसऱ्यांशी बोलत राहायचं....,!*


*"पुढे चला... खूप शिका...." असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस....*


*खचाखच भरलेल्या वर्गामधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच...*

*पण कुणावर विशेष लोभ नाही...*

*कोणावर राग तर मुळीच नाही...* 

*कुणाचा द्वेष नाही...*

*कुणाचा तिरस्कार नाही...*

*आपला संबंध फक्त शिकवण्यापुरता... !* 


*कुणी मध्येच शाळा सोडून गेला तर त्याचे दुःख सोसायच...* 

*कुणी मध्येच शाळेत आला तर त्याचं कौतुक करायच...* 

*दोघांसाठी नेहमीच वर्गाच दार उघडायचं...* 

*येईल तो येऊ दे.... जाईल तो जाऊ दे...*


*दहावीला  पोहोचायच्या आधी त्याला पैलू पाडत राहायचे....* 

*प्रत्येक वर्गात थोडावेळ थांबायच ....*

*आळोखे पिळोखे देत, आपलंच वर्ग आहे, असं समजून थोडावेळ रेंगाळायचं....*

*पण त्या वर्गात भावनिक गुंतायच नाही....*

*आपण इथे थांबता कामा नये, हे स्वतःशी बजावत, पुन्हा दुसऱ्या वर्गात पुढच्या "तासिकेला" जायचं....*


*"सिंगल" बेल मारली ,की शिकवण थांबावायचं... "डबल"बेल  मारली की दुसर्‍या वर्गात निघायचं.... बास, इतके साधे नियम पाळायचे....* 

*आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही...!*


*दहावीचा टप्पा म्हणजे शेवटचा स्टॉप आहे....सगळ्यांनी चांगले कौशल्य प्राप्त करून घ्यावे.... असं सर्वांना बजावत स्वतःच  निरोप द्यायचा आणि परीक्षा संपल्या की "मुक्या मनानेच" इतर विद्यार्थ्यांसोबत अध्यापनात रमण्यासाठी निघून जायचं.... !*


*उद्या कोणत्या वर्गात जायचं ?  कधी निघायचं ? कुठल्या मजल्यावर जायचं ? वर्ग कोणता असेल.... ? हे ठरवणारा वेगळाच असतो...*


*उद्या कोणत्या  तासिकेचे निरीक्षण असेल याची माहिती नाही... निरीक्षक कोण असेल याचीही खात्री नाही.... सोबत विद्यार्थी कोण असतील याची शाश्वती नाही...*


*शाश्वत एकच आहे... ते म्हणजे अधयापन...!* 


*आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही... अधयापन कोणाच ना कोणाच तरी सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि चिरंतन...!* 


*आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही... अधयापन मात्र सुरूच राहणार आहे.... निरंतर आणि निरंतर...!*

 💐💐  🙏🏻🙏

No comments:

Post a Comment