श्री.रामकृष्ण परमहंस म्हणाले "सिद्ध" कुणाला म्हणावे ? ज्याचे चैतन्यमय विशुद्ध आचार विचार भगवंताने आपल्या कृपादृष्टीत सामावून घेतले व जो सर्वार्थाने परिपूर्ण आहे असा साधक सिद्धपुरुष ठरतो. पूर्णपणे उमललेले कुठलेही फुल सिद्ध असू शकते. त्या उमलण्यात कृतज्ञता व परोपकारी वृत्ती अशा दोनच गुणांचा अतूट संगम असल्याचे आपण पाहतो. फुलाफुलातील वैविध्य मात्र एकमेव उद्देशाने , भगवंताची सृष्टी फुलकीत करण्याचे अभिवचन देते. फुलांच्या या निसर्गदत्त अवतारात मनुष्यत्वाचीही मनोधारणाही दडलेली आहे. मनुष्य आणि पुष्पजीवनात एक नैसर्गिक साधर्म्य आहे ते म्हणजे स्वतःचे गंधगुण ईश्वरसेवेत व परोपकारार्थ झिजविणे या परिसातून दोघांनाही सिद्धी मिळते हे नक्की. फुलांकडे जीवन ते मनुष्याकडे जीवनपद्धती आहे. फुलांचे जीवन स्वयंभू तर मनुष्याचे इच्छावर्धी. कठोर तपस्येतून त्यांनी भगवंताकडून वरसिद्धी मिळवलेल्या असतात. अत्यंत निग्रही मनोवृत्ती, निर्मळ अंतःकरण व निस्सीम भक्ती ही सिद्ध पुरुषाची प्रमुख लक्षणे मानावीत.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment