TechRepublic Blogs

Thursday, March 20, 2025

एकदाचे मोकळे......

 मला मोकळ करा...


संपूर्ण राज्याच राजकारण गलिच्छ करून झाल्यावर , पक्ष पक्षात ठेवला नाही, कीं घर घरात ठेवलं नाही, स्वार्थी राजकारणा पायी, राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाची वाताहत करून झाल्यावर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


आधी वेगळा विदर्भ म्हणून सुरवात करून, वेगळा काही करता येणार नाही समजल्यावर मुबंई च महत्व कमी करून, गैर मराठी माणसांना मुंबई मध्ये मोठे करून सुडाच राजकारण करून झाल्यावर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


मुंडे साहेब गेल्या नंतर खऱ्या अर्थाने ज्यांनी भाजपा महाराष्ट्रात वाढवली होती त्यामधील खरे शिलेदार खडसे साहेब, नंतर तावडे साहेब, नंतर पंकजाताई मुंडे साहेबांचा वारसा घेऊन उभी असताना , एका एका नेत्याला आपल्या वाटेतून बाजूला करून, आज स्वतःबरोबर त्यांना देखील संपवून टाकल्यानंतर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


शरद पवार यांचे राजकारण आता संपले आहें असे म्हणून, आता मैदानात कोणी पैलवानच नाही असे जाहीर करून, १०५ जागा जिंकून सुद्धा पवार साहेबांनी मैदान मारून सुद्धा जिरली नसताना, उद्धव साहेब आजारी असताना शिवसेना फोडून कपट कारस्थान करून झाल्यावर हा बाबा म्हणतोय, मला मोकळ करा...


मी पुन्हा येईन, पुन्हा येईन अशी आर्त किंकाळी देऊन... देऊन.., शेवटी दोन पक्ष फोडून आल्यावर सुद्धा , उपमुख्यमंत्री पदच नाशिबी आलं, आणि सरते शेवटी राज्यान या कपटी पणाला नाकारल्या नंतर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


भाजप सरकार सत्तेत आल्यावर भ्रष्टाचारी लोकांना चक्की पिसिंग, चक्की पिसिंग करायला लावणार म्हणताना ७० हजार पुरावे असताना सुद्धा त्यांनाच मंत्रिपद देऊन, त्यांच्या मांडीला मांडी लावून, स्वतः बरोबर त्यांना सुद्धा घेऊन बुडून गेल्यावर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


मुंबई मधील सगळी आंतरराष्ट्रीय केंद्रस्थाने गुजरात ला घालवून, महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार सुद्धा स्वतःच्या डोळ्यादेखत गुजरात ला पाठवून, शेवटी मुंबई महापालिका गिळणकृत करण्यासाठी, म्हणून शिंदेचा वापर करून झाल्यावर त्यांना देखील नेस्तनाबून कराव असा विचार करून झालेली प्लॅनिंग फसल्यावर, तेच शिंदे डोईजड झाल्यावर हा बाबा म्हणतोय मला मोकळ करा...


इतकं सगळं कपट कारस्थान करून झाल्यावर महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने मुकुटपने सगळं पाहून घेतले आणिवेळ आल्यावर एकदाच तुमचा कार्यक्रम करून, तुम्हांला मोकळ केल आहे.

      नाही गरज महाराष्ट्राला असल्या कपटणीतीची, या महाराष्ट्राचीं सुसंस्कृत राजकारणाची परंपरा अखंड राहील तुमच्या मोकळे होण्याने, गलिच्छ राजकारणाचा शेवट पण होइल तुमच्या मोकळ होण्याने म्हणूनच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत मोकळे होण्यासाठी...


व्हा एकदाचे मोकळे......


®विवेक जोशी...✒️

No comments:

Post a Comment