*नामस्मरणाने देहबुद्धि जाते*
(हृदय आठवणी: संकलन आनंद पाटील)
*उकसान गावच्या एका माणसाला महारोग झाला. योगायोगाने*
*श्रीमहाराजांशी त्याची गाठ पडली. श्रीमहाराजांनी त्याचेकडून*
*साडेतीन कोटी जपाचे उदक सोडवले व गोंदवल्यास राहण्यास*
*सांगितले. त्याने सहा वर्षात जपसंख्या पूर्ण केली. जसजशी जपसंख्या पूर्ण होऊ लागली* *तसतशी त्या माणसाची व्याधि झपाट्याने कमी होऊ लागली. आपण लवकरच रोगमुक्त होणार असे त्याला वाटू लागले.*
*एके दिवशी तो श्रीमहाराजांना म्हणाला, 'महाराज, आपल्या*
*कृपेने मी आता पूर्ण बरा होणार असे मला वाटू लागले आहे. पण मी जो साडेतीन कोटी जप केला त्याची पुण्याई खर्ची घालून माझा रोग मला बरा व्हायला नको आहे.* *माझा देहभोग भोगून संपवायला मी तयार आहे.' त्याचे हे बोलणे ऐकून श्रीमहाराज फार प्रसन्न झाले व म्हणाले, ‘नामस्मरणाने* *माणसाच्या वृत्तीमध्ये आमूलाग्र बदल होतो व त्याला वैराग्य प्राप्त होते, याचे हे धडधडीत उदाहरण आहे.' त्या*
*माणसाकडे वळून श्रीमहाराज बोलले, 'उत्तम चाकरी केली म्हणजे दिवाळीला पगारवाढ तर होतेच, शिवाय मालक दिवाळीचे काही बक्षीसही देतो. तुमच्या उपासनेवर राम खुष होऊन दिवाळीच्या बक्षिसाच्या पोटी तुम्हाला व्याधिमुक्त करीत आहे.
त्याचा स्वीकार आनंदने करावा.नामस्मरणाने तुम्ही जी पुण्याई संपादन केली ती अबाधित राहिली आहे.*
No comments:
Post a Comment