TechRepublic Blogs

Saturday, November 22, 2025

गृहकलह

 श्रीराम समर्थः 


*गृहकलह* 


         जीवनातील प्रतेक व्यक्तीला संसारातील मतभेद अथवा वादविवाद या प्रसंगांना कमी आधिक प्रमाणात तोंड द्यावे लागते. कधी नातेवाईक फार जवळचे असतात तर कधी दूरचे असतात. ती.बाबा या प्रसंगांना *"गृहकलह"* म्हणत असत. त्यांचे असे स्पष्ट मत होत की *'अशा प्रसंगी आपले कितीही नुकसान झाले तरी आपण त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडावे. गृहकलहाने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते तसेच ती नष्ट पण होते.* एकदा बोलता बोलता ती. बाबा मला [श्रीपाद बेलसरे यांना] म्हणाले की 

*जो प्रारब्धाचा सिद्धांत मानतो त्याने आपले आर्थिक नुकसान झाले तरी त्यातून लवकर बाहेर पडावे. आपल्याला जे मिळणार आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, व जे मिळणार नाही ते देऊ शकत नाही. म्हणून आपल्या सद्गुरुंवर निष्ठा ठेवून आपण त्यातून बाहेर पडावे. या कटकटींचा साधनावर कसलाही परिणाम होऊ देऊ नये.*


               ********* 

संदर्भः *पत्रांद्वारे सत्संग हे* श्रीपाद के. बेलसरे यांचे पुस्तक पान ५३

संकलनःश्रीप्रसाद वामन महाजन

No comments:

Post a Comment