*🍁🍁!!श्रीराम समर्थ!!🍁🍁*
*भगवंता इतके शुद्ध आणि पवित्र काही नाही. म्हणून देहाचे खाणेपिणे, त्याच्या सवयी, त्याचे आचरण उत्तम ठेवून त्याला शुद्ध आणि पवित्र ठेवावा. देहाला अपवित्र करणारे काम, क्रोध, द्वेष, लोभ, मत्सर इत्यादी विकारांना थारा देऊ नये. ते असेल तर वाईट वाटावे.
देहाचे प्रत्येक कर्म म्हणजे भगवंताची सेवा आहे, हे भान विसरू नये व सर्व कर्मे मनापासून करावी. देहावर मालकी भगवंताची आहे ही पूर्ण खात्री ठेवावी. देहाचे सुखदुःख मान-अपमान विशेषता: देहदुःख भगवंताच्या इच्छेने आलेले आहे ही भावना ठेवून ते समाधानाने भोगावे.
भगवंताचा सहवास देहाने नव्हे देहतील मनाने करायचा असतो. म्हणून २४ तास त्याच्या अस्तित्वाची आठवण ठेवण्यास त्याचे अखंड स्मरण ठेवावे. नामस्मरणाचा हेतू हाच आहे. आपल्या जीवनात जे घडते त्यात भगवंताची इच्छा पहावी. म्हणजे जे जे घडेल त्याचे कौतुक वाटेल. भगवंत सर्वांचा नियंता आहे. त्याची सत्ता सर्वांच्या जीवनावर चालते. तो आपल्याला बाहुली सारखा नाचवतो.हे जर विसरले नाही तर माणसांचा अहंकार केवळ नामभारी राहतो. माणूस आपल्या जीवनाकडे साक्षीपणाने पहायला शिकतो.*
*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*
*प. पू. सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*
No comments:
Post a Comment