TechRepublic Blogs

Saturday, November 8, 2025

भाव

 सर्वहृदय निवासी, सर्वसाक्षी असा परमात्मा प्रत्येकाच्या अंत:करणातील भक्ती जाणतोच. भगवंत म्हणतात "मी भक्तांमध्ये लहानमोठा, गरीब श्रीमंत असे भेद करीत नाही. भक्ती मोजायलाf माप काय आहे ? गुंजभर सोनं आणि मणभर सोनं, कसाच्या अंगाने दोन्ही सारखंच असतं. 

माझ्यासाठी भाव महत्वाचा. भावाच्या ठिकाणी मी आधीन आहे. तेथे मी येऊन राहतो. तिथला पाहुणचार देखील स्विकारतो." ज्या ठिकाणी प्रेम नाही, आपुलकी नाही, तेथे पाहुणे देखील जायला तयार होत नाही. चुकून गेलाच तर लवकर काढता पाय घेतो. आपण हवे आहोत की नको , हे सामान्य माणसाला ही समजते तर भगवंतांना समजणारच. भगवंतांना श्रीमंतीचे, मान सन्मानाचे कोणतेही कौतुक नाही.

 भक्ताच्या एकनिष्ठ भावासाठी भगवंत विकले जायला तयार आहेत. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. धुतराष्ट्राच्या राजवाड्यात पांच पक्वानांचे भोजन सेवण्या ऐवजी भगवंतांनी विदुराच्या घरी कण्या सेवन करणे पसंत केले, कारण भगवंतांना भाव समजतो.

No comments:

Post a Comment