*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात🙏🌺*
*आनंदसागर महाराज भगवंताचं नाम मुखामध्ये असू दे असंच सांगतात. आजकाल व्हाॅट्सऍपवर बरेच संदेश फिरत असतात. त्यापैकी एका संदेशात कबीरानं जपमाळ तोडून टाकली कारण जो अगणित देतो त्याचं नाम मोजून का घ्यायचं अशा आशयाचा तो संदेश होता. कबीरांची गोष्ट वेगळी आहे.
आपल्याला संतांनी दररोज २१६०० इतकं नामाचं माप ठरवून दिलेलं आहे. तेवढं आपण दररोज पूर्ण करायला हवं तरच आपल्याला कबीरांप्रमाणं वागता येईल. काहीजण म्हणतात आम्ही मनातल्या मनात जप करतो , नुसतं ओठ हलवणं बरं वाटत नाही.
श्रीमहाराज म्हणतात , सतत ओठांची हालचाल असणं ही माझा माणूस असल्याची खूण आहे कारण माझा मनुष्य सतत नामातच असला पाहिजे. संतांनी वैखरीचं महत्त्व सांगितलेलं आहे. वैखरीनं नाम घेण्याची का लाज बाळगायची ?
थोडंफार नाम झाल्यावर आपण मध्यमेमध्ये पोहोचलोय की काय असं वाटू लागतं. पण हा आपला अहंकारच नामाच्या आड येत असतो. वैखरीनं , टाळ्या वाजवत नामाचा आनंद घ्यावा असं संतांनीच सांगून ठेवलेलं आहे .*
*संदर्भ - आनंदसागराचा धनी*
*लेखक - रविंद्रदादा पाठक*
No comments:
Post a Comment