TechRepublic Blogs

Tuesday, November 25, 2025

अनुसंधान

 श्रीराम समर्थ


         खोलींतील अंधार नाहीसा करण्यासाठीं अनेक उपाय केले तरी तो तसाच राहातो; पण नुसता एक दिवा आंत आणला कीं तो आपोआप नाहींसा होतो. अगदीं त्याचप्रमाणें अशाश्वत वस्तूंची आवड नाहींशी करण्यासाठीं शमदमासारखीं अनेक साधनें केलीं तरी तीं नाहींशीं होण्यास कठीण पडतें. पण भगवंताच्या स्मरणाचा सतत अभ्यास केला तर आपोआप नको त्या गोष्टी गळून पडतात.* *अर्थात् सामान्य मनुष्यानें आपल्या प्रपंचांत वैराग्याचें बंड वाढविण्याच्या नादीं न लागतां भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास करणें योग्य आहे. भगवंताचें श्रवण, मनन आणि नामस्मरण करणें याचें नांव अनुसंधान होय.*


             --------- *प्रा के वि बेलसरे*

              *********

संदर्भः उपनिषदांचा अभ्यास हे त्यांचेच पुस्तक पान ९१

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

No comments:

Post a Comment