TechRepublic Blogs

Sunday, December 15, 2024

अंतर्मुख

 अंतर्मुख याचे दोन अर्थ आहेत. मुख म्हणजे तोंड आपलं तोंड आत मध्ये वळविणे हा खरा अर्थ. पण परमार्थात अर्थ असा आहे की आपली इंद्रिये जी बाहेर धावतात त्या इंद्रियांचे तोंडं आत मध्ये वळवणे म्हणजे अंतर्मुख होणे. ते झाल्याशिवाय परमार्थ नाही. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले " साधक कसा पाहिजे , तर नाम घेणारा पाहिजे. नाम घेणारा कसा पहिजे तर डोळे उघडले की हे जग दिसते, डोळे झाकले की ते जग नाहीसं होणं हे साधकाचे लक्षण आहे."  आपण आपली एक प्रतिमा बनवलेली असते.ही प्रतिमा जशी असेल तसं बाहेरचे जग  दिसतं. मग अंतर्मुख होताना ही प्रतिमा आपणच भंग करायची असते. यालाच "मी पणा नाहीसा होणे " म्हणतात. त्यासाठी नम्रता आवश्यक आहे. श्री.कृष्णमूर्ती म्हणाले परमार्थात  "नम्रता ही अत्यंत जरूर आहे." अध्यात्माचा प्राण असेल तर नम्रता आहे. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात " अती लीनता सर्व भावे स्वभावे." श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले " खरा लीन माणूस लोण्यासारखा असतो." कुठूनही स्पर्श करा मऊ आणि गोडच असणार. परमार्थाला लागणारी साधक वृत्ती बाणलेला मनुष्य सहज लीन होईल. आपली लीनता ही बाहेरची असते. आतून ती लीनता आली पाहिजे. ह्या साठी अंतर्मुखता हवी.

No comments:

Post a Comment