🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*या विश्वातील सर्वच संतांनी, भक्तांनी भगवंतावर निस्सीम प्रेम करुन परमानंदाची प्राप्ती करून घेतली आहे. जो जगाचा जनिता, विश्वाचा जनिता, आहे ना तो फक्त आणि फक्त एका प्रेमाचा भुकेला आहे, प्रेमानेच आळवला जातो. ज्ञान - अज्ञानाच्या, सुख -दुःखाच्या पलीकडील तीरावर असलेले परमानंद स्वरुप असलेले परब्रह्म म्हणजे भगवंत हे प्रेम भक्तीने भुलले आहेत. ज्या भगवंताची व्यापकता इतकी व्यापक आहे की, त्या व्यापकतेला सुद्धा आदिही नाही व अंतही नाही.
त्या भगवंताला फक्त एका आईच्या प्रेमाने बांधले गेलेले आपण पाहिले आहे. अशाच निरुपम प्रेमाने भगवंताला गौळणींनी, गोपीकांनी, भक्तांनी, संतांनी, सद्गुरुंनी बांधले आहे. त्या प्रमाणेच प्रेम भक्तीने भगवंताला बांधले असता, सर्व सुखाचे सुख त्या भगवंताच्या श्रीमुखकमळावर शोभून दिसते.
आपल्या अज्ञानी जीवाला सुद्धा त्या जगाचा स्वामी असलेल्या परब्रह्माला प्रेमाने बांधायचे, आपलेसे करायचे असेल,
तर त्यांना मनोभावे शरण जाऊन त्यांचे सतत स्मरण करून त्यांची काया, वाचा, मनाने प्रेमपुर्वक सेवा करावी म्हणजेच त्यांना तनु मनाची कुरवंडी करुन ओवाळणे होय.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment