*अक्षय्य तृतीयेचे रहस्य:*
१) याच दिवशी सत्ययुग संपून त्रेतायुग चालू झाले. साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त ! नवीन वस्त्र, शस्त्र, सोने इत्यादी खरेदीस प्रमुख योग !
२) याच दिवशी व्यासांनी महाभारत रचण्यास व गणपतीने ते लिहिण्यास सुरुवात केली.
३) अक्षय्य तृतीयेस अन्नपूर्णा माता प्रकट झाली, विष्णूचा सहावा अवतार परशुरामाचा जन्म रेणुकेच्या उदरी झाला, तसेच विष्णूचे अन्य अवतार नर - नारायण व ह्याग्रिव प्रकटले
४) याच दिवशी हिमालयातील बद्रीनारायण, आणि केदारनाथ मंदिराची कपाटे दर्शनास उघडतात, ती बरेचदा दिवाळी पर्यंत उघडी राहतात.
५) याच दिवशी पृथ्वीवर गंगावतरण झाले, अशी एक कथा आहे
६) जैन पंथाचे तीर्थंकर ऋषभदेव यांनी मोक्षप्राप्ती साठी एक वर्षभर उपवास केल्यावर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उसाचा रस हस्तीनापुर येथील राजाकडून ग्रहण केला
७) या दिवशी आपले पितर, पूर्वज आणि कुलदेवता यांना स्मरून केलेले दान अक्षय्य स्वरूपाचे होते, त्याचा कधीच क्षय होत नाही, असे भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरास सांगतात (इति महाभारत). नवीन कार्यप्रारंभाला शुभ दिवस आहे.
८) या दिवशी गंगा नदीत किंवा समुद्रात स्नान पुण्याचे आहे.
९) तृतीय / तीज उत्सव: कैरीची डाळ, पन्हे, भिजवलेले चणे इत्यादी देवीस नैवेद्य म्हणून दाखवून हळदी कुंकू समारंभाची प्रथा ! आंबा, आमरस, आंब्याचे पदार्थ बनवणे, देवी देवता यांना आंब्याची सजावट इत्यादी करण्याची प्रथा !
-------------------- 🕉️ --------------------
🚩 "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" 🚩
No comments:
Post a Comment