TechRepublic Blogs

Thursday, December 19, 2024

इंग्रजीचं फॅड

 आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं 

ABCD .......XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !

आणि आता 

ABP माझा , CID , MRI , X-ray , Z-TV विचारूच नका .

आमच्या लहानपणी , 

This is Gopal . अन That is Seeta .हे दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !


अहो कंडक्टर याच्यामुळे की .....आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने , 

हं sss काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ?

असा प्रश्न विचारला की ते पोट्ट हमखास म्हणायचं .....

मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !

तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं 

फक्त एवढंच विचारायचे ....

*पहिल्या झटक्यात पास झालास न ?*

आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा !

म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !

*लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .*

तुम्ही बघा पूर्वी ....

गाव छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी 

उसनपासन केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता , *तरीही मजा खूप होती!*

https://chat.whatsapp.com/JiiqqeV7MlULXEitCDXmS5

*तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !*

उसनपासन करावंच लागायचं ......

साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता 

त्यामुळे कोणाकडे " हात पसरणे " म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही .

उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा " कमीपणा " वाटत नव्हता !

डोकं दुखल्यावर *शेजाऱ्याकडे अमृत अंजनच एक बोटं उसन मागायला सुद्धा* अजिबात लाज वाटली नाही .

घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !


कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !

गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती , कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,

 तक्के , उषा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्या शिवाय " पोरगी दाखवायचा  कार्यक्रम " होऊच शकत नव्हता !

*आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय !*

आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही !

जेंव्हा *Status वर* डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं !


हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे

भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा .....

जेवलास का ?

झोपलास का ?

सुकलास का ?

काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारतांना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल     स्वरच जगण्याचं बळ देत असतो !


*माणसाशिवाय ,गाठीभेटीशिवाय , संवादाशिवाय काssssही खरं नाही !*



_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*



No comments:

Post a Comment