TechRepublic Blogs

Tuesday, December 24, 2024

पंचामृत

 

             श्रीराम,

  पंचविषयांचे पंचामृत अर्पण करण्याचा विचार करण्यापूर्वी आपण भगवंताला पंचामृताचा अभिषेक का करतो ते आधी थोडक्यात बघू. आपल्या कोणत्याही पूजेत पंचामृत हा महत्त्वाचा घटक मानला जातो, याशिवाय पूजा अपूर्ण समजली जाते. कारण आपल्या पूर्वजांना दही, दूध तूप शर्करा आणि मध हे पाच घटक योग्य प्रमाणात मिसळले असता आणि ते तीर्थ म्हणून प्राशन केले असता, त्याचा शरीराला होणारा फायदा माहीत होता.. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या सर्व पूजेत या अमृताचा समावेश केला आहे.

                आपल्याकडे असलेल्या सर्वोत्तम गोष्टी मग त्या अन्नातील का असेना, देवाला अर्पण करायच्या, ही भावना समर्पण शिकवते. त्याचबरोबर देव म्हणजे फक्त मूर्तीतील नव्हे तर आपले आईबाबा, गुरू इतकेच नव्हे तर घरी येणारा अतिथी देखील देवच आहे ही शिकवण आपल्याला दिली जाते. स्वतःसकट सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, सर्वांनी तंदुरुस्त राहण्यासाठी या पंचामृताचे प्राशन करावे ही त्यामागची भावना आहे. 

       आपण प्रार्थना करतो, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. आणि प्रार्थनेबरोबर पंचामृताचे तीर्थ देतो.. त्यामुळे मनातील सकारात्मक भाव त्यात उतरतात आणि त्याचा सगळ्यांनाच शारीरिक व मानसिक दृष्ट्या खूप फायदा होतो. 

                  ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment