⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*मराठी भाषेतील 'पाणिनी'*
*व्याकरणकाराच्या जन्मदिनाची*
⚜️⚜️💐⚜️⚜️
🌹⚜️🌸🔆📚🔆🌸⚜️🌹
*अठरावे शतक. १८१८ ला पेशवाईचा अंत होत मराठा साम्राज्य लयास गेले. इंग्रजी सत्तेने देशभर पक्के पाय रोवले होते. देशभरात राजकीय आणि सामाजिक सुधारणांची नितांत गरज होती. अशा वेळी अशा एका थोर व्यक्तीचा जन्म झाला ज्यांनी ज्ञानमार्ग अवलंबून समाजात शाश्वत परिवर्तन घडवले. त्या आमुलाग्र सुधारणांची मधूर फळे आज समाज चाखतोय.*
*हे समाज सुधारक म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेचे 'दादा' अर्थात दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४-१८८२). जन्म खेतवाडी मुंबई. वसईजवळ तर्खड इथे आजही त्यांचे घर.. स्मारक आहे.*
*इंग्रजी ही सत्ताधारी इंग्रजांची भाषा. त्यांची सत्ता जगभरात होती. विष्णूशास्त्री चिपळूणकर 'इंग्रजी' ला वाघिणीचे दुध म्हणत. ही भाषा देशभरातील तळागाळातील लोकांना येणे अत्यंत गरजेचे होते. पण इंग्रजांच्या व्देषाने आणि एक परकीय अवघड भाषा समाजाला शिकवणे फारच दिव्य होते. इंग्रजीच काय व्याकरण शुद्ध मराठीही लोकांना येत नव्हती.*
*दादोबांचे प्राथमिक शिक्षण पंतोंजीकडे झाले. तरीही शिक्षक म्हणून त्याकाळात पहिलाच पगार दिडशे रुपये होता. पूढे ते कलेक्टरही झाले.*
*आज मराठी भाषेला व्याकरणशुद्ध वळण लावण्याचे.. इंग्रजीचे मराठीत भाषांतर करण्यात त्यांचे योगदान क्रांतिकारक ठरलेय. त्यांना मराठी.. इंग्रजी.. संस्कृतसह गुजराथी आणि फार्सी भाषाही अवगत होत्या. त्यांनी शिक्षण सुरु असतानाच 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' हे पुस्तक १८३६ मध्ये लिहले आणि प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. याचे महत्त्व जाणून शिक्षण विभागाने त्यांचे व्याकरण पुस्तक समाविष्ट करण्याचे ठरवले अन् दुसरी आवृत्ती अमेरिकेत छपाई करुन हे पुस्तक आले. यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली.*
*१८६५ साली त्यांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती 'मराठी लघु व्याकरण' ह्या नावाने प्रकाशित केली. हे पण पुस्तक पुढे शालेय शिक्षणात प्रदीर्घ काळ प्रचलीत होते. त्यांच्या लघु व्याकरणाच्या १२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. याच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. महाराष्ट्रात तळागाळातील मुलांना दिडशे वर वर्षे सुलभतेने त्यामुळेच इंग्रजी शिकता आले. इंग्रजी ही शेवटी तत्कालीन शासनाची आणि जगाची भाषा. इंग्रजी शिकणे म्हणजे तर्खडकर हे समीकरणच घरोघरी झाले होते. आज महाराष्ट्रात लोकांना इंग्रजी येते याचे श्रेय दादोबांना आहे.*
*त्यांनी प्रार्थना समाज.. मानवधर्म सभा.. परमहंस सभा या धर्म सुधारणा संस्थांच्या उभारणीत सहभाग घेतला. विधवा पुनर्विवाह चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. सरकारी उच्चपदावर नोकरी करुनही ते समाज सुधारणेत अग्रणी होते. इंग्रजांनी त्यांना 'रावबहादूर' पदवी दिली होती.*
*१८३६ ते १८८१ पर्यत त्यांनी लिहलेले सात महाराष्ट्र भाषा व्याकरण ग्रंथ हे फारच मोठे कार्य ठरलेय. त्यांचे अतिशय सुलभ भाषेतील प्रांजळ निवेदनाचे १८४६ पर्यंतचे चरित्र हे अव्वल इंग्रजीतील पहिले आत्मचरित्र आहे. ज्यामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णनही आहे. 'मराठी नकाशांचे पुस्तक'.. 'धर्मविवेचन', 'पारमहंसिक ब्राह्मधर्म', मोरोपंतांच्या केकावलीवर 'यशोदापांडुरंगी' असे विविधांगी लिखाण केले. स्विडिश तत्वज्ञाच्या ग्रंथावर उत्तर देताना त्यांनी लिहलेल्या ग्रंथाची युरोपात प्रशंसा झाली.*
*संस्कृत.. मराठी भाषाप्रेमी या थोर समाजसेवक.. व्याकरणकाराला जन्मदिनी विनम्र अभिवादन. मराठी भाषेचे सौंदर्य सांगणारे हे गीत.*
🌹⚜️🌸📚🌺📚🌸⚜️🌹
*शृंगार मराठीचा नववधू परी*
*अनुस्वाराचं कुंकू भाळावरी*
*प्रश्नचिन्हांचे डूल डुलती कानी*
*स्वल्पविरामाची नथ भर घाली*
*काना काना जोडून राणी हार केला*
*वेलांटीचा पदर शोभे तिला*
*मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल*
*वेणीत माळता पडे भूल*
*उद्गारवाचक छल्ला असे कमरेला*
*अवतरणाची लट*
*खुलवी मुखड्याला*
*उकाराची पैंजण छुमछुम करी*
*पूर्णविरामाची तीट गालावरी*
🌹📚🌸📚🌺📚🌸📚🌹
*कवी आणि गायक अनामिक*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*०९.०५.२०२४*
🌻☘📚🌻🌸🌻📚☘🌻
No comments:
Post a Comment