आपण आधी पंचामृताचे महत्त्व आणि त्याचा प्रतीकात्मक अर्थ देखील बघूया.
शारीरीकदृष्ट्या दुध दही तूप साखर आणि मध ह्या पदार्थांचे आपले आपले उत्तम गुण आहेत. योग्य प्रमाणात जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांचे गुण अधिक पटीने वाढतात. उदा - :दुधाने रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्याच बरोबर प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन ए, बी १२ पण मिळते. दही हे प्रोबायोटीक रुपात कार्य करते, यात अमिनो अॅसिड असल्याने आपल्या पचनसंबधित समस्या दूर होतात. गायीच्या तूपात अँटी - इंफ्लामेट्री गुणधर्म असल्याने ते चेहरा खुलवतात, तसेच डोळे, गळा, आणि हृदयाला अधिक निरोगीपण प्रदान करतात. साखर ही उर्जा देणारी म्हणून महत्वपूर्ण मानली जाते आणि मध हे पंचामृतामध्ये वापरल्या गेलेल्या या सर्व गोष्टींचा प्रभाव वाढवण्याचे काम करते. ह्या फायद्यांशिवाय अजून खुप फायदे या प्रत्येक घटकात आहेत.
थोडक्यात पंचामृत प्रसाद म्हणूनच नाही तर दैनंदिन आहारात जर समाविष्ट केले तर त्याच्या सेवनाने बुद्धी तल्लख होते, स्मरणशक्ती वाढते, तसेच त्वचा निरोगी राहते. पंचामृत पित्त शामक असून ते शरीरातील पित्ताला संतुलित ठेवते. त्याचे सेवन पचनक्रियेसाठी उत्तम ठरते.
आणखी वैशिष्ट्य म्हणजे दुध शुद्धता आणि पवित्रता दर्शवते. दही समृद्धीचे प्रतीक आहे. तूप शक्ती आणि विजयासाठी असते. साखर आनंद आणि गोडवा आहे.. तर मध समर्पण आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment