*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*थोडासा विचार करून बघावा. नामाला लागण्याआधी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा राग यायचा, अगदी संताप व्हायचा. दिवस दिवस मन दु:खात होरपळत राहायचं. परंतु आज तशा घटना घडत असतानाही आपण नाम निरंतर घेत असाल तर आपला संताप, नित्य घटनांचा स्वतःवर होणारा परिणाम याची मात्रा निश्चितच कमी झालेली आढळेल. याचाच अर्थ आपण घेत असलेलं रामनाम आपणास विश्वाचं मिथ्यत्व उलगडून दाखवत आहे.
हे दृश्य विश्व असत्य आहे , अपूर्ण आहे. आम्हाला सत्याकडं, पूर्णत्वाकडं जायचंय आणि त्यासाठी मुखामध्ये भगवंताचं नाम अखंड , निरंतर राहणं महत्त्वाचं आहे. आता प्रश्न आहे ते घ्यायचं कसं? रामनामाशिवाय अजून कुठला उपाय नाही का? यावरही आपण विचार करायला हवा. कलियुगाचा प्रभाव असल्यानं असे अनेक प्रश्न आपल्या मनात येणारच.*
*संदर्भ - आनंदसागरा धनी*
*लेखक - रविंद्रदादा पाठक*
No comments:
Post a Comment