TechRepublic Blogs

Tuesday, June 10, 2025

ध्येय

 पिचलेल्या मनाचे भाग वेगळे झालेले असतात. ते सगळे एकत्र यायला पाहिजेत. जे जन्मतःच तयार असतात. ते पिचणारच नाहीत. अनुसंधान टिकणे महत्वाचे. ती पार्श्वभूमी ठेवून त्यावर चाललं पाहिजे. तुम्ही आम्ही वरवरचे करतो ना त्यामुळे टिकत नाही. 

 व्यवहार करील पण लिप्त होणार नाहीत. आपण तोंडानी ध्येयकरता आहे म्हणतो , पण त्याच आपल्याला भान राहत नाही. सारखी जाणीव राहिली तर जमेल. म्हणून श्रीमहाराज म्हणाले या युगाचे महत्व म्हणजे तो अनुसंधानाच्या मार्गाने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल.

 उदा. आपल्याला प्रवासाला जायचे असेल तर आधीपासूनच अनुसंधान असत सकाळपासून की संध्याकाळी आपल्याला डेक्कनने जायचे आहे. ते जाण्याचे अनुसंधान असते पण आपण  गुरुगृही जाताना सुद्धा गुरुगृहाचे अनुसंधान नसते. कशाकरता जातोय हे अल्प लक्षात राहते म्हणूनच ते सहलीला गेल्यासारखे जातो. 

पु.श्री.ब्रम्हानंदबुवा गोंदवले येथे जाऊन श्री.महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पीत नव्हते. आपण किती विसरतो. ध्येय लक्षात रहात नाही, पटकन विसरतो. त्याला सत्संगती लागते. उदा. भारत आणि चीन यांच्यात युद्ध चालू होते. पु. तात्यासाहेबांना श्री.बेलसरे यांनी विचारलं की हे युद्ध किती दिवस चालेल. ते म्हणाले श्री महाराज काय करतील ते त्यांची इच्छा असेल तसं होईल. त्यावर श्रीबेलसरे म्हणाले तुम्ही म्हणताय त्याचा आर्थ काय? महाराजांचा आणि युद्धाचा संबंध काय? ते म्हणाले( आपण म्हणतो ना बिरुदावलीत श्री महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक ) सर्व जगच जर त्यांच्या म्हणजे गुरूंच्या इच्छेने चालते ही भावना सतत सारखी असेल तर हे युद्ध पण त्यांच्याच इच्छेने त्यांच्याच सत्तेने चाललं आहे अशी खात्री पाहिजे.

No comments:

Post a Comment