श्रीराम समर्थ
परमार्थाला सोपा उपाय म्हणजे *सद़्गुरूंना आवडेल ते करणे, त्यांना शरण जाणे आणि ते आपल्या जवळ आहेत ही भावना वाढवणे.* आपला निश्चय कमी पडतो व त्यामुळे प्रगती होत नाही. आता उडी घेतली पाहिजे आणि त्याची तर भीती वाटते. *ही भीती घालवण्यासाठी संतांची वचने आणि पदांचे चिंतन करावे.* ते उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे. *कबीराचे 'मन लागो यार फकीरीमें' हे पद बरेच दिवस माझ्या मनात घोळत होते आणि त्याचा मला फायदा झाला.* पुढे जाण्यासाठी प्रेम आणि विचार दोन्ही पाहिजे.
--------- *प्रा के वि (बाबा) बेलसरे*
*********
संदर्भ: *अध्यात्म संवाद (भाग-पहिला) पानं १३८*
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन
No comments:
Post a Comment