।। जय जय रघुवीर समर्थ।।
*तर, एक नम्र विनंती* 🙏
तर, आता आजच्या लेखास सुरुवात करतो🙏
*कालचा प्रश्न...*
*प्रपंच करायचा की नाही?*
*नाती जपायची की तोडायची?*
संसारात अशी नाती तोडता येत नाहीत, अशी काही स्टेटमेंट्स प्रतिक्रिया म्हणून आली🙏
मंडळी, श्री समर्थ " *साधनेत येणारे अडथळे सांगत आहेत* आणि ते सुद्धा
' *ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या साधकांना '*
ह्याचा अर्थ आपण फक्त
' *ते वाचन* ' करायचे आहे🙏
*अनुकरण* करण्यासाठी समजून घ्यायचे आहे🙏
*आता, आपण* ...
*प्रपंच सुखाने करावा, नेटका करावा* ...
*नाती तोडायची?*
तर मुळीच नाही, आहेत ती जपायची आहेतच🙏
*मग काय करायचं?*
प्रपंच करताना 3 शब्द पक्के डोक्यात असावे🙏
*उचित, प्रमाण , अलिंप्य*
जे करावे ते ' *उचित* ' असलं पाहिजे. 🙏
जे कराल ते ' *प्रमाणात* ' असलं पाहिजे, वाहवत जायचं नाही. 🙏
जे कराल त्या पासून ' *अलिंप्य* ' राहता आलंच पाहिजे 🙏
आता,
चिंतन पहावे की
' *मला जर साधना करायची आहे, माझ्या सद्गुरूंची आज्ञा, गुरुवाक्य प्रमाण मी मानले पाहिजे आणि त्याचवेळी मांडून ठेवलेला ' प्रपंच ' हे दोन्ही कसे करावे?*
श्री समर्थ म्हणतात,
*तये क्रियेचे लक्षण।*
*आधी स्वधर्म रक्षण।*
*पुढे अद्वैत श्रवण।*
*केले पाहिजे।। श्रीराम।।*
*साधकाने, बाधक कर्मे सोडायची आहेत, पण मग नेमकी कुठली कर्मे करावी जेणेकरून परमार्थ अंगी बाणेल?*
*साधकाने नेमक्या कोणत्या क्रिया कराव्या?*
*कर्मस्वरूप कसे असावे?*
*स्वधर्म रक्षण म्हणजे नेमके काय?*
*अद्वैत श्रवण, म्हणजे काय?*
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करू
तो पर्यंत, कृपया ' *वाचन* ' नक्की करावे
🙏🙏
धन्यवाद
*समीर शशिकांत लिमये*
No comments:
Post a Comment