TechRepublic Blogs

Friday, April 4, 2025

विचार

 एक राजाला चार राण्या होत्या.


पहिली राणी इतकी सुंदर होती, कि तो तिला प्रेमाने बघतच रहायचा.


❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!



❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा .



❕पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!



❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला,


 "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"



❕राणी म्हणाली "नाही, मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे."



❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली,


 "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन.  त्यापुढे नाही.



❕राजाला अपार दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, 


"तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?



❕तिसरी राणी म्हणाली, "नाही.  तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्या एका बरोबर जाणार आहे," 



❕आता मात्र राजाच्या दु:खाला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ??



❕माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकट वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले.



❕तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिच्या अंगावर दागिने नव्हते. तिला अंगभर कपडे देखील नव्हते की

मूठभर मांस नव्हते.  



❕ती म्हणाली, "तुम्ही जाल तिकडे मी येईन.  स्वर्गात असो की नरकात ..  कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचन आहे."



❕राजा थक्क  होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला की, जिला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, 

पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी केली नाही, ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे?


 राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला.



❕कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला..?


❕त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला?



❕तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच आहोत.


🔸आपली पहिली राणी, जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले *शरीर*! ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.


🔸आपली दुसरी राणी स्मशानापर्यंतच आपल्याला सोडण्यास येते, ती म्हणजे आपली मुले, आप्तेष्ट, मित्र व  *समाज.*


🔸आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते ती म्हणजे, *धन-पैसा* . आपल्या मृत्युनंतर  लगेच ती दुसऱ्याची होते.


🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे *पुण्यकर्म,माणुसकी धर्म* ! जे आपण सदभावनेने, निःस्वार्थीपणे, आणि विना अहंकाराने करावे, पण ते न करता,  जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ देत नसतो.  तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतच असते...!!!!




एक चांगला विचार.....



No comments:

Post a Comment