*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*श्रीमहाराजांनी खास गोपाळकाल्यावर एक सुरेख प्रवचन केले आहे. त्यात ते म्हणतात की , " दहा वस्तू जिथे एकत्र येतात तिथे काला होतो. पण त्यात गोपाळ असेल तर गोपाळकाला होतो , त्यामध्ये गोडवा म्हणजे आनंद येतो. " त्याचप्रमाणे प्रपंचाच्या या काल्यात सर्व गोष्टी एकत्र आल्या तरी त्यात आनंदस्वरूप गोपाळ नसेल तर तो काला गोड कसां होईल ? सारे भेदाभेद विसरून विविध व्यवसायातील श्रीमंत , गरीब , स्त्री , पुरुष अशी असंख्य माणसे श्रीमहाराजांकडे आजही येतात , तेव्हा हा जो माणसांचा काला होतो त्यांना श्रीमहाराजांची संजीवक कृपा लाभते आणि भगवंताच्या वा सद्गुरूंच्या मंगल अस्तित्वाने त्यांच्या प्रपंचाचा गोपाळकाला होऊन खऱ्या समाधानाचा गोडवा प्रत्येकाच्या जीवनात उतरावा यासाठीच श्रीमहाराजांच्या समाधीस्थानावर श्रीकृष्ण मूर्ती विराजमान आहे असे नि: संदिग्धपणे म्हणता येईल.*
*संदर्भ - चैतन्यस्मरण २०२४*
*चराचर मोहिले,*
*तुझी मूर्ती पहावया !*
No comments:
Post a Comment