TechRepublic Blogs

Monday, September 22, 2025

छोटी उद्दिष्टे

 चिंतन 

              श्रीराम,

         अमृतबिंदू उपनिषदात म्हटले आहे की, हे मनच आहे की जे दुःख भोगायला लावते. बंधनात टाकते आणि मनच आपल्याला निरपेक्ष आनंदाचा अनुभव घ्यायला मदत करते. बंधनातून मुक्त करते. मुक्तीच्या आनंदाची अनुभूती घेण्यासाठी आपल्या मनाला नेमके समजावून सांगावे लागते. जे समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितले आहे.

                  मनाने कायम सकारात्मक विचार करण्यासाठी त्याच्या समोर एखादे ध्येय असावे लागते. कारण ध्येय नसलेली व्यक्ती ही पंख नसलेल्या पक्ष्यासारखी असते. जर पक्षाला पंख नसेल तर तो त्याच्या जीवनात कधीही उडू शकणार नाही. तसंच आपलं पण आहे.

 आयुष्याला दिशा देण्यासाठी एक लक्ष्य असावे लागते. या ध्येयाकडे वाटचाल करताना छोट्या छोट्या उद्दिष्टांची पूर्तता करावी लागते. छोटी छोटी उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करता आली की, मन आनंदित होते व सकारात्मक विचाराने भरून जाते. मग पुढील पावले जास्त आत्मविश्वासाने टाकता येतात. त्यासाठी मनाची मात्र पूर्ण तयारी करावी लागते.

                        ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment