*श्रीराम समर्थ*
गीतेमध्यें भगवंतांनी नामाला यज्ञ म्हटलें आहे. त्यास यज्ञ म्हणण्यात फारच मोठा अर्थ भरला आहे. यज्ञामधें फारच मोठें दान करावे लागतें. त्याच प्रमाणे अतिशय व्रतस्थ राहावें लागते. माझे म्हणणे असे कीं आपण आपल्या नामस्मरणासाठीं आपल्या फालतू आशा आकांक्षांचे भगवंताला दान करुन टाकावें. आणि यज्ञकर्ता जसा व्रतस्थ राहतो तसें आपण अतिशय पवित्र व सात्विक जीवन जगावें. एकच सांगावेसे वाटते की आपल्याला ज्या गोष्टींची अत्यंत हौस असते व जिच्यामध्यें आपले मन सहज रमते आणि जिच्यामुळें जगांत आपल्याला महत्व येते - ती भगवंताला देऊन टाकणे याचे नांव दान होय. असे दान दिल्यावर भगवंताच्या नामाचे प्रेम मागे लागेल.
---------प.पू. बाबा बेलसरे
*********
संदर्भः पत्रांद्वारे सत्संग हे त्यांचेच पुस्तक
*संकलनःश्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment