TechRepublic Blogs

Wednesday, September 24, 2025

नामाची तार

 *श्रीराम समर्थ*


         एकादशीच्या दिवशी देहाला कमी खायला घालून उपासना करायची असते. हे एकादशीचे महत्व आहे. आपल्याकडे म्हण अशी आहे की, एकादशी अन् दुप्पट खाशी. अरे, उपास करण्यामागचा हेतू काय आहे ? 

         धारवाडला भालचंद्रशास्त्री म्हणून आहेत. कृष्णशास्त्रींचे हे नातू आहेत. दोन-तीन वर्षापूर्वी मी वेंकटापूरला गेलो होतो. तेंव्हा ते बंगलोरहून आले तर कृश झालेले दिसले, म्हणून म्हटले 'शास्त्री बुवा, आपण अशक्त दिसता !' तर ते म्हणाले 'मी कृश झालेलो आहे-अशक्त नाही'.  कारण काय? तर म्हणाले 'आठ दिवस बनारसला conference होती. त्यात राजेशशास्री प्रमूख होते. राजेशशास्री म्हणजे प्रचंड विद्वता. तेव्हा भालचंद्रशास्त्री म्हणाले 'आठ दिवस राजेशशास्त्री दूधाशिवाय कांही पीत नव्हते. मी ही तसाच राहिलो. कारण काय? तर म्हणाले, बूद्धि तीक्ष्ण रहाते'. बुद्धीला सूक्ष्मता यायला खाणे असे बेताचेच पाहिजे.

         एकादशीला पोट हलके ठेऊन जर नामस्मरण केले तर नामाची तार अशी लागते की बोलायची सोय नाही. 

         तरी तुम्ही एकादशीला पोटभर खात जा हां ! तुम्ही काय करावे हे सांगणारा मी कोण?तुम्ही काही माझे विद्यार्थी नव्हेत, माझे मित्रही नव्हेत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. तेंव्हा एकादशीला मन सुक्ष्म असते, ते आत्म्याशी संलग्न व्हायला उत्सुक असते. महाराज म्हणाले काय करावे ? आपल्या लोकांना विपरीत करावयाची सवय असते.  

एकादशीला हलके अन्न खावे व शक्य तितके नामस्मरणात असावे आणि मी बोलणे बरे नाही लोक त्याचा विपरीत अर्थ करतील, फराळाचे पोटभर खाऊन सुस्त होण्यापेक्षा थोडा दुध-भात खाऊन पोट हलके ठेऊन नाम घेतले तरी एकादशी फळेल.' मी पुन्हा सांगतो की महाराजांच्या शब्दांचा अर्थ असा नाही की, तुम्ही एकादशीला दुध-भात खा!  तसे नाही ते. त्यांच्या सांगण्याचा हेतू असा कीं पोट जितके हलके ठेवता येईल तेवढे हलके ठेवा.


               *********



*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

No comments:

Post a Comment