*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*
*पू. बाबा : ज्योतीऐवजी श्रीरामाचीं किंवा श्रीमहाराजांची सतेज मूर्ती कल्पावी. हे ध्यान करतांना ताटस्थ्य-शून्यावस्था येत नाही ना हे पाहिले पाहिजे. श्रीमहाराजांच्या विचारांपेक्षाही त्यांच्या जीवनातील घटनांचे चिंतन केले तर त्याचा नामस्मरणास चांगला उपयोग होतो. आपण जणू काही ते प्रसंग पुन्हा जगतो. (In fact, we relive those incidents)*
*अनुसंधान ठेवण्यास मन रिकामे ठेवावे किंवा संतचरित्रातील गोष्टींचे चिंतन करून मन त्यांनी भरून टाकावे. रिकाम्या मनात प्रसन्नता रहात असेल तर ते करायला हरकत नाही. पण सर्वसामान्यपणे आपल्या गुरूंच्या चरित्रातील प्रसंगांचे कल्पनेने स्मरण केले तर त्याचा आतील इंद्रियांशी स्पर्श होऊन अनुसंधान चांगले टिकेल.*
*🍁अध्यात्म संवाद🍁*
No comments:
Post a Comment