TechRepublic Blogs

Tuesday, May 13, 2025

समाधानी

 श्रीराम समर्थ


         माणसाने आयुष्यांत काहीही पराक्रम केलेले असोत, अखेर भगवंताच्या स्मरणाशिवाय इतर काही उपयोगी पडत नाही हे आपण शिकावे. या देहाच्यापायी माणूस अगदी लाचार दीन होतो. बरे, कोणाची मदत न घेता जगावे म्हटले तर ते शक्य होत नाही. अशा अडचणींमध्ये भगवंताच्या नामांत राहणाराच मनाने समाधानी राहू शकेल. देहाला लागणाऱ्या सोप्या सोयी करुन घ्याव्या पण त्याच्यामुळे मी सुखी आहे असे वाटतां कामा नये. आपले तिथें घोडे पेंड खातें.


         *प्रकृति अस्वास्थाच्या या सगळ्या खटापटीमधे नामाचा अभ्यास ढिला पडता कामा नये. खरे म्हणजे त्याचा नाद लागवा, येता जाता, जरा वेळ मोकळा मिळाला की नाम घेत बसावें. असो, नामाविषयी सांगावे तेवढें थोडेच वाटते.*


               --------- *प्रा के वि बेलसरे* 


               ********* 

संदर्भः *पत्राद्वारे सत्संग* पान ७१-७२ 

संकलन श्रीप्रसाद वामन महाजन

No comments:

Post a Comment