TechRepublic Blogs

Wednesday, May 14, 2025

संसार

 *संसार भगवंताच्या आड येत नाही.*  (संकलन आनंद पाटील)


*कारण कां म्हणाल तर, संसार हा जीवनाच्या बाह्यांगाचाच विषय आहे; पण भगवंत आणि त्याचे नाम जीवनाच्या अंतरंगाचा विषय आहे. हा संसार माणसाला त्रास देत नाही. तो जड आहे. तर* *माणसाच्या मनात पोसलेली, घट्ट रुतूनशी बसलेली संसारासक्ती आड येते. देह, पुत्र, कलत्र, धन, गृह, लौकिक इत्यादि " अहं - मम"* *ज्ञानाचे विषय ज्यात असतात, त्याला स्थूल संसार म्हणतात.*

*"असोनि संसारी" याचा अर्थ असा नव्हे की, नाम घेण्याकरता संसारातच असावे* *लागते. याचे तात्पर्य इतकेच की, ज्यांना पूर्व* *संस्कारामुळे संसारासक्ती सुटत नाही, अशा संसारासक्तांना पण हरिनाम* *घेता येते. नाम घेता-घेता नामाची गोडी लागते, आणि संसारासक्ती हळू-हळू कमी* *होते. कारण नामस्मरणाने* *संसाराचे लटकेपण कळून येते; पटते. त्यामुळे त्याची गोडी कमी होते व ज्याचे नाम, त्या* *भगवंताची गोडी* *वाढतच जाते. आपले* *श्रीतुकोबाराय काय म्हणतात ते पहा, " तुका म्हणे नाही*


निरसला देह। तोवरी हे अवघे सांसारिक ॥" 

*ज्यांच्या देहाचा नाही तर देहबुद्धीचा निरास झाला नाही ते संसारीच. त्यामुळे त्यांनी पण नाम घ्यावयासच पाहिजे. वेदांनी व सर्व शास्त्रांनी बाहू उंचावून नामस्मरणाचा गौरवच केला आहे. मनुष्यमात्राला त्याचा अधिकार सांगितला आहे.*

" *सकळांसी येथे आहे अधिकार." नामस्मरणाच्या आड कोणताही वर्णाश्रमधर्म येतच नाही. याच्या उलट नामस्मरणावाचून* *वर्णाश्रमधर्म केवळ व्यर्थ आहेत; कारण कोणतेही वर्णाश्रमधर्माला अनुसरून असणारे कर्म सांग -सफल होण्यासाठी नामाचीच गरज आहे. “*

   *एकंदरीत काय तर* *नामस्मरणासाठी मनुष्यमात्राला शास्त्रमान्यता आहे, सामर्थ्यही आहे, ज्ञानही आहे, पण इच्छा ( नाम घेण्याची ) मात्र प्रबळ पाहिजे. इच्छाच नसेल तर बाकी नामस्मरण होणार नाही.* *दिवसातून एकदाच नामस्मरण केलं ( टाकणं टाकल्यासारखं ) व बाकी सर्व काल संसारातच*

*व्यतीत केला तर मात्र ते नाम उद्धारास पर्याप्त म्हणजे पुरेसे नाही.* "हरिचे चिंतन सर्वकाळ ।" किंवा गोविंदाचे पवाडे ||" नामस्मरण सतत व " दिन - रजनी हाचि धंदा |

*शीघ्र वेगाने ( म्हणजे दोन उच्चारात- स्मरणात अंतर नको) करावयास हवे. अशाने काय होईल?*

*"अशा अविश्रांत, अखंड नामस्मरणाने, चित्तात अन्य विषय, विकार, विकल्प शिरण्यास वावच मिळणार नाही. जसा ट्रॅफिक जाम झाल्यावर, रस्त्याच्या पलीकडे जाण्यास अवसरच / संधी मिळत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितले,*

"जिव्हे वेगू करी । ” "भागवतकार म्हणतात, "हे जिव्हे रससारज्ञे, सर्वदा, मधुराप्रिये। नारायणास्य पीयूषं, पिब जिव्हे निरंतरम् ||" 

*एवढी एक जीव्हा वश झाली,तर मग बाकीच्या इंद्रियांचा काय पाड ? आपल्या जनाबाई म्हणतात,*

 "दळिता कांडिता । तुज गाईन अनंता । न विसंबे क्षणभरी । तुझे नाम गा मुरारी ॥ नित्य हाचि कारभार । मुखी नाम निरंतर ।। "

No comments:

Post a Comment