TechRepublic Blogs

Thursday, May 1, 2025

मोठे भक्त

 *श्रीराम समर्थ"


*ती बाबा लिमये -  पुण्यातील श्रीमहाराजांचे एक मोठे भक्त*


[ती तात्यासाहेब केतकर यांच्या रोजनिशीतून] 


आम्ही [ तात्यासाहेब]  पुण्यात रा. रानडे यांचे वाड्यात रहात असताना रा. बाबा लिमये म्हणून एक गृहस्थ श्रींचे दर्शनास आले. मधूनमधून येत असत. श्रीमहाराजांबरोबर बराच वेळ बोलत असत. श्री बाबा लिमये हे श्री [ संत] रामभाऊ रानडे यांचे काॕलेजातील सहाध्याही होते. एम.ए,चा अभ्यास दोघेही करीत. 

पण घरगुती अडचणीमुळेच शरीरपीडेमुळे बाबा परीक्षेला बसू शकले नाही. श्री रामभाऊंचे ते गुरुबंधू होते. ते अत्यंत समाधानी होते. त्यांचे स्वतःचे डोळे बिघडलेले होते. पुढे पुढे त्यांस मुळीच दिसेनासे झाले. नोकरी नव्हतीच. काही शिकवण्या होत्या, त्याही प्रकृतीमानामुळे टिकत नव्हत्या. 

दुसरे कोणतेही उत्पन्न नाही. त्यांच्या पत्नी फार साध्वी होत्या. त्यांचेही समाधान वाखाणण्यासारखे होते.  पूर्वीच्या काळच्या त्या मॕट्रिक होत्या पण नोकरीमागे गेल्या नाहीत. श्री बाबाचें रहाण्याचे ठिकाणी वारा अगर ऊन मुळीच येत नव्हते. भर उन्हाळ्यात घरातील जमिन ओलीचिंब असे. कोणी आपलेपणाने मदत केली तर खपत नसे. कोणी काही दिले, अगर त्यास विशेष मान दिला तर म्हणत की,'असे चालले तर माझे येणे बंद होईल.'  अशा सर्व परिस्थितीत त्यांचे समाधान अलौकिक होते. श्रीभगवंताचे कृपेचेच लक्षण होय. श्रीमहाराजांचे त्यांचेवर व त्यांचे श्रींवर अत्यंत प्रेम होते. 


त्यांस श्रीमहाराजांनी दर रविवारी  सवडीप्रमाणे कोणचीतरी पोथी वाचण्यास सांगितले होते. त्यांनी पोथी वाचण्यास प्रथम सुरवात ता. २०-१०-१९३५ पासून केली. ते सुमारे एक तास सांगत असत. नंतर श्रींचे प्रवचन होई. रा. बाबा लिमये चांगला अभ्यास करुन मुद्देसुद सांगत असत. 

श्रीमहाराजांचा मुक्काम पुण्यात असेपर्यंत आमचे बि-हाडी वाचत. त्यानंतर रा अण्णासाहेब मनोहर आजारी होते म्हणून तेथे वाचण्यास श्रींनी विचारले. त्यांनी कबुल केले. असे हे वाचन बरोबर बारा वर्षे चालू होते. एक दिवसही खंड पडला नाही. मंडळी कोणी असली नसली तरी त्यांनी नेम चुकविला नाही.  

बरोबर बारा वर्षांनी श्रीमहाराज पुण्यात अण्णासाहेबांकडे गेले होते. त्या दिवशी रविवार होता. बाबा आले, त्यांनी पोथी वाचली, व श्रीमहाराजांस नमस्कार करुन म्हणाले,' आपण सुरवात केलेल्या पोथीचे वाचनास आज बारा वर्षे पुर्ण झाली. माझे आयुष्यात एवढा एकच नेम इतका वेळ कधीही न चुकता शेवटास गेला.' श्रींस फार आनंद वाटला. श्री म्हणाले,' त्याचे फळ श्रीराम देईलच.' व यापुढे पुरे करण्यास सांगितले.


                  ***** 


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

No comments:

Post a Comment