*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*पू. बाबा : श्रीमहाराजांच्या येथे नियमित येणाऱ्या भक्ताला श्रीमहाराज म्हणाले की सर्व संसार सुस्थितीत असणे देखील चांगले नाही. ते गोड विषासारखे आहे. त्या गृहस्थांना हे सांगणे रुचले नव्हते. खरोखर सत्य व प्रिय सांगणे अवघड आहे.*
*दुसरी एक सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वीची हकिगत. बडोद्याचे एक गृहस्थ मुंबईला मेकॅनॉन मेकॅन्झीत नोकरीला होते. बोरीवलीस रहात. पुढे मालाडला राहायला आले. येथे ते श्रीमहाराजांकडे येत असत. पुढे ते आजारी पडले तेव्हां श्रीमहाराज त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आले. मीही त्यांच्याबरोबर गेलो होतो. पुढे त्यांचा आजार वाढला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यावेळी मी त्यांच्याजवळ होतो. तेथून परत आल्यावर श्रीमहाराजांनी मला विचारले की अंतकाळी त्यांना रामाचे तीर्थ घातले ना? मी म्हणालो, तीर्थ कसले घालता ? त्यांचे प्राण केव्हांच गेले होते ! तेव्हां श्रीमहाराज म्हणाले, तुम्हा लोकांची श्रद्धा नाही; तीर्थ आपले काम करतेच. आत्तादेखील त्यांचा सूक्ष्म देह स्मशानात त्यांच्या स्थूल देहाभोवती घिरट्या घालतो आहे. आपण श्रद्धेत किती कमी पडतो ते ह्या प्रसंगावरून लक्षात आले.*
*-- अध्यात्म संवाद*
No comments:
Post a Comment