TechRepublic Blogs

Monday, May 5, 2025

अनन्य निष्ठा

 प.पु.श्रीगोंदवलेकर महाराजांच्या शिष्य परंपरेतील एक शिष्य प.पु.श्रीप्रल्हाद महाराज यांची एक आठवण. संत एकनाथ महाराजांप्रमाणे श्रीप्रल्हाद महाराजांच्या ठिकाणीही अपार शांतता होती. 

त्याप्रमाणे त्यांनी आपल्या शिष्यानाही सर्व परिस्थितीत शांत राहण्यास शिकविले. श्रीप्रल्हाद महाराजांचे अकोल्याचे श्री दिनकरराव देव नावाचे शिष्य होते. कोर्टात त्यांचा खटला चालू होता. 

दुर्दैवाने कोर्टाचा निकाल त्यांच्या विरुद्ध बाजूने लागला त्यामुळे त्यांची संपूर्ण शंभर एकर जमीन त्यात गेली. जवळ काहीच राहिले नाही. प्रपंचिकला फार मोठा धक्का होता. त्यांना आपल्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. खूप नैराश्य आले." सद्गुरुवाचोनी सापडेना सोय" असे वाटून ते साखरखेरड्याला पु.श्रीप्रल्हाद महाराजांच्या मठात आले. त्यांनी सर्व वरील हकीगत महाराजांना सांगितली.

 तेव्हा महाराज त्यांना म्हणाले "रामरायाची इच्छा.  गेले त्याची काळजी करू नये. रामरायचा आठव ठेवावा. तोच यातून मार्ग काढील. रामरायाच्या नैवेद्यासाठी पेढे घेऊन या." म्हणून अशा परिस्थितीत गुरू आज्ञा मानुन एक पाव पेढे आणून ते वाटले. त्यानंतर देवांचे एक मारवाडी मित्र होते. त्यांची जमीन खूप चांगली होती व भरपूर होती. ते देवांना म्हणाले " माझी तुम्ही पाच एकर जमिन करा. तुम्हालाच ठेवा. 

देवांना संकोच वाटला तेव्हा मारवाडी मित्रा म्हणाला तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा पैसे द्या." त्या जमिनीची किंमत त्यावेळी पंधरा सोळा हजार रुपये होती. देवांना ता जमिनीत इतके पीक मिळाले की प्रपंचाच खर्च भागून पंधरा सोळा हजार वर मिळाले . 

ते त्यांनी एक वर्षातच त्या मारवाडी मित्राला दिले. दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्या शेताला जोडून असलेली त्याच मारवाडी मित्राची वीस एकर जमीन विकत घेतली. त्या उत्पन्नातून मुलीचे लग्न मुलांची शिक्षणं सर्व केले. ते म्हणायचे " माझा प्रपंच महाराजांनीच केला." "सद्गुरूंवर अनन्य निष्ठा असेल तर सद्गुरू मदत केल्या शिवाय राहत नाहीत."

No comments:

Post a Comment