*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*
*रोज श्रवण करण्याचा नियम ठेवावा. सद्गुरूच्या किंवा साधकाच्या मुखाने भगवंताबद्दल, नामाबद्दल व भक्तीबद्दल श्रवण करण्याने नकळत श्रद्धा वृद्धिंगत होते. सद्गुरूच्या मानसिक सहवासाने भगवंताचे दर्शन हे जीवनध्येय निश्चित होते. साधनाचे कष्ट कोठेपर्यंत वाटतात? भगवंत हवाच अशी तळमळ लागेपर्यंत.
म्हणून तळमळ लागण्यासाठी रोज मनापासून प्रार्थना करावी. अनुसंधानाची चटक लागली की भगवंत मागेमागे चालतो. परंतु, मला भगवंत हवा ही तळमळ एकाच पातळीवर टिकत नाही. आतमधील व बाहेरील अशुभ शक्ती साधकाला खाली ओढतात. पण तेथे त्याचा विचार करणे उपयोगी पडत नाही.
आपले विचार अज्ञानामधून उगवतात. त्यांच्यापासून आपली सुटका करून घ्यावी. खरे म्हणजे आपले अंतरंग निस्तरंग व्हायला पाहिजे.* *सारे पूर्वग्रह नाहीसे होऊन निर्विकल्प व निर्विचार झालेले मन अनुसंधानास पात्र असते. अनुसंधानाला आकार नाही, विकार नाही व पर्याय नाही.* *म्हणून नामामध्ये चित्त रंगू लागले की अनुसंधानास निराळा प्रयत्न करावा लागत नाही.*
*प. पू. बाबा बेलसरे*
No comments:
Post a Comment