*अध्यात्म संवाद*
संकलन आनंद पाटील
*गोंदवल्याला श्री. आण्णासाहेब घाणेकर रोज जेवणे झाली की पंधरा-वीस ताटे डोक्यावर घेऊन नदीवर धुवायला जात.*
*श्रीमहाराजांना हे समजले तेव्हां एकदा आण्णासाहेब ताटे गोळा करीत असतांना श्रीमहाराज तेथे गेले आणि म्हणाले,*
*"असू दे, आण्णासाहेब, बाकीची माणसं करतील. श्रीमहाराजांनी सांगितले म्हणून त्यावेळी* *आण्णासाहेब थांबले आणि नंतर त्यांनी ताटे धुवून आणण्याचा क्रम तसाच चालू ठेवला. पुढे श्री.
आण्णासाहेबांना अर्धांग झाले तेव्हां श्रीमहाराज मला बरोबर घेऊन बेळगावला त्यांना भेटायला गेले. आण्णासाहेबांचे शरीर लाकडासारखे झाले होते. गेल्याबरोबर श्रीमहाराज त्यांना भेटले. महाराज आले*
*आहेत म्हणून त्यांना सांगितले* *तेव्हां प्रथम त्यांना समजले नाही. पण समजल्यावर ते मोठ्याने रडू* *लागले. श्रीमहाराज म्हणाले, त्यांचा भावनेचा भर ओसरल्यावर आपण* *त्यांना भेटू.* *नंतर (पेटीवर) भेटल्यावर श्रीमहाराजांनी त्यांना विचारले,*
*'आण्णासाहेब, नाम चालू आहे ना ?' तेव्हां हृदयाकडे हात दाखवून ते म्हणाले, 'ऍथे चालू आहे.' कंटाळा वाटत नाही ना म्हणून विचारल्यावर नाही* *म्हणाले. फक्त माझ्यामुळे ह्या लोकांना कष्ट होतात याचे वाईट*
*वाटते असे म्हणाले. तेव्हां श्रीमहाराज म्हणाले,* *'आण्णासाहेब, त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली.' पुढे म्हणाले, 'माझी माणसे कशी आहेत ते दाखवायला ह्या मुलाला आणले आहे. ' आणि मला म्हणाले, 'माझ्या गळसरीतला एकेक मणी गळून पडत आहे.' (पहा : अध्यात्मसंवाद भाग १ संवाद. १०४ )*
संकलन आनंद पाटील
No comments:
Post a Comment