श्रीराम समर्थ
*पू बाबां बेलसरे यांनी साधकांना केलेली महत्वाची सुचना*
आपण परमार्थाकडे वळलो की आपल्या मित्रांनी, नातेवाईकांनी तिकडे वळावे असे आपणांस वाटू लागते. *आपला हेतू चांगला असतो पण आपले उद्दिष्ट विसरून आपण ह्या नसत्या व्यापात गुरफटून जाण्याची भीती असते. आपल्याला विशेष काही साधलेले नसते पण लोकांना सागण्याची उबळ येते. ह्या धोक्यापासून सावध राहिले पाहिजे.* माझेच सांगतो, १९३५-३६ चा सुमार असावा. श्रीमहाराजांकडे नियमित येऊ लागलो होतो. एक दिवस के. इ. एम. हाॕस्पिटलमधल्या माझ्या जुन्या वर्गमित्राला - डाॅ फडके यांना - श्रीमहाराजांकडे घेऊन आलो. श्रीमहाराजांना ते आवडले नाही. फडके गेल्यावर महाराज मला म्हणाले, *कोणत्या सत्पुरुषाकडे कोण जाणार, तो तिकडे टिकणार की नाही हे ठरलेले असते. आपण त्या भानगडीत पडू नये. म्हणून मग मी यांनाही [सौ. आईंना] सांगितले होते की मला हे महाराज आवडले आहेत पण तुमचे तुम्ही स्वतंत्रपणे ठरवा.*
**********
संदर्भः *अध्यात्म संवाद [भाग-३] पान १८०-१८१*
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
No comments:
Post a Comment