*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*
*जसजसे नाम वाढत जाईल तसतसे तुमचा सत्वगुणाचा साठा वाढत जाऊन तुम्हाला एका नामाशिवाय काही करावेसे वाटणारच नाही. नाम हेच तुमचे मुख्य धेय्य होऊन जाईल व तुम्ही त्यातच डुंबून जाल. मात्र हे मी महाराजांच्या कृपेने करतोय हे सतत आपल्या मनाला बजावत रहा. म्हणजे अहंकार येणार नाही. महाराज म्हणतात की नाम करत असाल ना तर काही करायची गरज नाही. तुम्ही कुठेही समाजात मिसळायची गरज नाही. लोकच तुम्हाला शोधत येतील. पुढे जाऊन महाराज म्हणतात हे तर काहीच नाही स्वतः संत तुम्हाला येऊन सदिच्छा देऊन जातील.ही नामाची जादू आहे. खूप सोपं साधन आहे. पण आपण आपल्याला प्रपंचात गुंतवून घेतल्यामुळे ते अवघड होऊन जातं. महाराजांना सतत आळवत रहावं की महाराज काही तरी द्या मला. कीती दिवस प्रपंच ओढायाचा ? तुम्ही मनापासून आळवलं की ते देतात.....नामच देव, नामच* *पारसमणी, नामच विधाता....*
*गोंदवले म्हणजे नामाचा महासागर*
*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*
No comments:
Post a Comment