TechRepublic Blogs

Thursday, May 23, 2024

मृत्यू

 *मृत्यू : जीवनातील एक महन्मंगल क्षण !*



*सर्वच माणसं मृत्यूला भितात आणि ते स्वाभाविकही आहे.*

*कारण, कोणालाही इहलोकात आपण निर्माण केलेले गोकुळ सोडून जाण्याची कल्पना दुःखदायक वाटणारच. त्यातल्या* *त्यात आकस्मिक होणारा मृत्यू सर्वांनाच भीतिदायक वाटतो. तेही* *अगदी स्वाभाविक आहे. हे दुःख आपल्यासाठी नसते, तर आपल्यावर अवलंबून* *असणार्यांच्या  असहाय्यतेच्या कल्पनेतून निर्माण झालेले ते एक सात्त्विक दुःख असते, असेच म्हणावे लागेल.*

   *शोक कुणी करायचा? ज्याला आयुष्यात काहीच करता आलं नाही, पारमार्थिक, सुसंस्कार संपन्न जीवन जगता आलं नाही, आला तसा गेला आणि मध्यंतरी* *इतरांना जड भार झाला, उपद्रवी ठरला ई, त्यानं मृत्यूचा शोक करावा. कारण त्याच्या दृष्टीनं जन्म हाच मृत्यू आणि मृत्यू हाच अशुभ जन्म.*

   *म्हणून हे ध्यानात असू द्या की, जीवन चांगलं जगा,सुसंस्कृत जीवन जगा,परमेश्वराच्या* *अस्तित्वाचं भान राखून त्याच्या नामस्मरणाने, साक्षीने सारी कर्तव्य कर्मे करा, ती त्याला अर्पण होणार आहेत याचं भान* *राखा. तुमच्या मुखातून सदा नामजप होत चांगली कर्मे झाली तरी मृत्यू केंव्हाही येवो तो* *जीवनातली महन्मंगल क्षण ठरेल व त्याक्षणी तुम्हाला शाश्वत आनंद भेटेल.

 संकलन आनंद पाटील*

No comments:

Post a Comment