*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात🙏🌺*
*मनुष्यजन्मास येऊन साधायचे काय ? या प्रश्नाला उत्तर देताना श्रीमहाराज म्हणाले , ' सध्या तुम्ही मनाचे ताबेदार आहात. भगवंताची भक्ती करून मन तुमचे ताबेदार व्हायला पाहिजे. त्याने मनावर पूर्ण स्वामित्व येईल. ही स्थिती प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे. मनावर स्वामित्व येऊन देखील भागत नाही . त्याच्या पुढे जावे लागते. संपूर्ण मनोनाश ही अवस्था प्राप्त व्हावी लागते. तीच ' न मन ' अवस्था होय. त्यासाठी ' नमन ' हा एकच उपाय आहे. नमन याचा अर्थ भगवंताला अथवा सद्गुरूला संपूर्ण शरण जाणे. '*
*||श्रीराम जय राम जय जय राम||*
No comments:
Post a Comment