TechRepublic Blogs

Monday, April 29, 2024

परमार्थ

 ज्ञानमार्ग काय किंवा कर्ममार्ग काय दोघांनाही अनुभव सारखाच. शेवटी हे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येतात. एकाचा स्वयंपाक सिद्ध झाला आहे. ज्ञानमार्ग हा सिद्ध भोजन आहे. कर्ममार्ग्याचं भोजन साध्य होत आहे. पण भोजन झाल्यावर तृप्ती सारखीच असते दोघांना. फक्त ज्ञानमार्गी माणसाचा आणि सांख्यमार्गी माणसाचा अधिकारच वेगळा असतो. आपण गुरुकडे जातो. ते आपला स्वीकार करतात आणि आपला मार्ग ओळखतात आणि त्याप्रमाणे वागवतात. एकदा पु.श्री.रामदास स्वामी एकाकडे जेवायला गेले होते. तेथे एक मुलगा रांगोळ्या घालीत होता. त्याने सुंदर रांगोळ्या घातल्या.

 समर्थानी त्या  मुलाबद्धल चौकशी केली. त्या गृहस्थानी सांगितले हा माझ्या विधवा बहिणीचा मुलगा आहे. शांत आहे. समर्थ त्याच्या आईला म्हणाले " हा मुलगा आम्हाला देता का ?" त्या बाईंनी हा मुलगा दिला तोच पुढे कल्याणस्वामी झाला. काय कमालीची निष्ठा होती ह्या पुरुषाची. 

अलीकडच्या काळातील पु.श्री.विवेकानंद. पु.रामकृष्णांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता. त्यांच्या थुकीतून रक्त पु यायचं. ते ते एका ग्लासात टाकायचे. तो ग्लास भरला तर शिष्यांना म्हणाले की हा ग्लास बाहेर दूर नेऊन टाका.तर विवेकानंदांनी तो ग्लास घेतला आणि पिऊन टाकला. काय त्यांची अर्पण बुद्धी असेल. गुरूला देणं म्हणजे काय असेल. हा ज्ञानमार्गाचा अधिकारी. पाहता पाहता तद्रूपता पावतो. हा माझा देह तुझा आहे , तू त्याचं काय वाटेल ते कर. म्हणून  गुरूची आवड , कमालीची आवड हा परमार्थ आहे. पु.श्री.कल्याणस्वामींच एक वचन आहे " मज आवडतो मम स्वामी | 

निशिदींनी अंतर्यामी || रात्रंदिवस मला त्या माझ्या गुरुचि आठवण आहे.

No comments:

Post a Comment