जेवढे नामस्मरण कमी तेवढ्या अडचणी जास्त. जेवढे नामस्मरण जास्त तेवढी आपली शक्ती जास्त. या नामस्मरणाने जी शक्ती निर्माण झाली तीच जीवनाचा आधार. हीच शक्ती सर्व संकटांना दूर करते.
हनुमानजीनी समुद्रावरून जाताना कित्येक अडचणी आल्या पण त्यांच्या मनात श्रीरामाचे स्मरण होते त्यामुळे या अडचणीतून ते पार झाले.
केव्हाही काहीही घडू शकते पण यावर उत्तर उपाय म्हणजे नामस्मरण. पण आपलं नाम घेण कधी कधी स्वार्थी असते. ते श्रीमहाराजांशी एकरूप होत नाही कारण आपली शरणागती कमी पडते. शरणागती ठेवून नामस्मरण केले की सर्वयात्रा, परिक्रमा या एक नामस्मरणातचआहेत.. फक्त तो भाव मात्र हवा.. यात्रेत जर मन प्रपंचात असेल तर यात्रा करून अनुभव येणार नाही पण प्रपंचात राहून मन यात्रा करत असेल तर ती यात्रा, परिक्रमा किंवा अजून काही एका नामात मिळेल.. जे काही मिळवायचे आहे ते एका नामाने साध्य होईल...
!! श्री महाराज !!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!! श्रीराम समर्थ!!
No comments:
Post a Comment