*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*पू. बाबा -- श्री. गोपीनाथ पोतनीस असेच खूप आजारी होते. काही अन्न घेत नव्हते. श्रीमहाराजांना (पेटीवर) हे सांगितले तेव्हां मी त्याला सांगतो असे श्रीमहाराज म्हणाले. नंतर पू. तात्यासाहेबांना श्रीमहाराज असे म्हणाले म्हणून सांगितल्यावर ते म्हणाले की तो (पोतनीस) काही सांगण्याच्या पलीकडे गेला आहे आणि आता महाराज त्याला काय सांगणार आहेत ? पुढे त्यांच्या घरी गेल्याबर श्रीमहाराजांनी (पेटीवर) त्यांना गोपीनाथ म्हणून हाक मारली आणि बेशुद्ध असलेला तो गृहस्थ, काय महाराज म्हणाला ! श्रीमहाराज त्याला म्हणाले की,*
*अरे तू काही खात का नाहीस ? ते म्हणाले, आता काही खावेसे वाटत नाही. श्रीमहाराज म्हणाले की तू काही खाल्ले नाहीस की मला वाईट वाटते. तेव्हां ते खातो म्हणाले. पहा, श्रीमहाराजांनी दिलेले आश्वासन किती खरे आहे.* *जागेपणी आणि शुद्धीवर* *असतांना तुम्ही नाम घ्या; मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम टिकवायची जबाबदारी माझी असे त्यांनी म्हटले आहे. म्हणून अखंड नाम घेतले पाहिजे. आपले असे कां होत नाही ? काय अडथळा येतो ?*
*-- अध्यात्म संवाद*
No comments:
Post a Comment