TechRepublic Blogs

Friday, April 19, 2024

ज्ञानयोगी

 एक पक्षी आहे, त्याला झाडावरचा आंबा खायचा आहे तर पक्षी काय करील ? तर "पक्षी उडेल आणि त्या फळाला झोंबेल. तसं माणसाला करता येणार नाही. तो या फांदीवरून त्या फांदीवर जाईल आणि शेवटी ते फळ प्राप्त करून घेईल." तसं ज्ञानयोगी जो आहे हा एकदम पक्ष्यासारखा उडेल आणि झोंबेल. कर्मयोगी माणूस पायरी पायरीन जाईल. त्याला वेळ लागणारच. हा हळूहळू या फांदीवरून त्या फांदीवर जाऊन केव्हातरी ते फळ प्राप्त करून घेईल. याचा अर्थ की तो जर मार्गात राहिला तर आपल्या मुक्कामाला पोहोचेल हे निश्चित. ज्ञानमार्गाला विहंगम मार्ग म्हणतात. तर दुसरा आहे  कर्ममुक्ती मार्ग. कर्मयोगी मार्ग आहे हा काळाच्या आधीन आहे. योग्य काळ यायलाच पाहिजे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे " तुका म्हणे नाही चालत तातडी |  प्राप्त काळ घडी आल्याविण || तो अनुकूल काळ यावाच लागतो. तिथे तातडी चालत नाही. कितीही धडपड करा काहीही व्हायचं नाही वेळ आली की सगळं भरभर होऊन जातं. व्यवहारामध्ये वेळ लागतो तसं कर्मयोगामध्ये सुद्धा ते आहेच. समजा की तुम्हाला कोणी मार्गदर्शक नाही तुम्ही साधन करीत आहात. तर ती वेळ आली की साधनाचा मार्ग दाखवीणारा भेटतो. पुष्कळवेळा असं होतं की जो तुम्हाला गुरुकडे आणतो तो गायब होतो तुम्ही चिकटता. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले की  कर्मयोगामधे किंवा भक्तिमार्गामध्ये जीवाची जी वाढ होते त्याला वेळ यावी लागते. कारण भक्तांची जी वाढ आहे ती काही व्यवहारासारखी नाही. ती जीवाची वाढ आहे. जीव शेवटी शिव बनवायचा आहे. त्यांनी उदा. दिले एका राजाची राणी गरोदर होती. तिला दोन महिने झाले होते. ती म्हणाली की मला ते दोन महिन्याचे मूल दाखवा आणि परत ठेवा. हे शक्य आहे का. नाही त्याला नऊ महिने जावेच लागणार. तसं एक मोठा गुरू आहे आणि त्याचा अंतरंगातला शिष्य आहे तरी योग्य वेळ आल्याशिवाय काही करता येत नाही.

No comments:

Post a Comment