*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*पू. बाबा - श्रीमहाराज देहात असतांना गंगूबाई नांवाच्या एक बाई येथे स्वयंपाकघरात काम करत असत. स्वयंपाक आणि इतर काम झाल्यावर शेवटी ब्रह्मानंद महाराजांबरोबर त्या जेवायला बसत असत. एक दिवस श्रीमहाराजांनी त्यांना त्यांच्या पंगतीला जेवायला बसायला सांगितले. त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून श्रीमहाराजांनी पुन्हा गंगूबाई, आज माझ्याबरोबर जेवायला बसा म्हणून सांगितले. पण तरीदेखील शेवटी ब्रह्मानंद महाराजांबरोबर बसायचे म्हणून त्या जेवायला बसल्या नाहीत. नंतर जेवायला बसल्या तेव्हां श्रीमहाराजांची आज्ञा आपण पाळली नाही ही मोठी चूक केली हे लक्षात येऊन त्यांना रडू आले. पण आता संधी हुकली होती. आज्ञापालन अतिशय महत्त्वाचे आहे. अगदी लहानसहान बाबतीत देखील गुरुआज्ञेबाहेर जाता कामा नये.*
*-- अध्यात्म संवाद*
No comments:
Post a Comment