TechRepublic Blogs

Thursday, April 11, 2024

"समर्थ"

 पु.श्री.बेलसरे यांना पु.श्री .समर्थ रामदास स्वामी यांच्या वाड्.मयाचा अभ्यास करीत असताना त्यांना दोन श्लोक आढळले. ह्या श्लोकांनी त्यांच्या जीवनावर अतिशय परिणाम झाला. ज्यांना श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणत असत की हे आपल्याच योग्यतेचे पुरुष होते. त्यातील एक श्री.जयराम स्वामी आणि दुसरे रंगनाथ  स्वामी . तिसरे  आंदमूर्ती होते ते हैदराबादचे केशवस्वामी हे ज्ञानी पुरुष होते. ह्या सर्वांनी समर्थाना  "समर्थ" ही पदवी दिली. त्यांनी आपल्या जीवनाचा अनुभव सांगीतला आहे. आपलं जीवन किती परिस्थितीमुळे बांधल गेले आहे, किंवा माणूस परिस्थितीला 

किती लाचार होतो. श्लोक  

नजावेची तेथेचि लागेल जावे |

न खावेची जे तेचि लागेल खावे |

वदावेचिना तेचि लागे वदावे |

स्वभावेचि निर्माण केलेचि देवे ||

आपण काय तऱ्हेचे धान्य खातो. धान्य कितीही चांगलं आणलं तरी त्यात काय मिश्रण असेल सांगता येत नाही. अनेक वेळा कसं वागावे हे तुमच्या हाती नाही. हे सगळं तर विश्वामध्ये निर्माण होऊन आलेलं आहे. आपण हॉटेलात खातो, काय प्रतीचं खाद्य तेथे मिळतं हे आपण जाणतो. "प्रसंगे घडे तेचि मानून घ्यावे | " ज्या वेळेला जे घडेल ते मुकाट्याने सोसावे लागते. "अहंता गुणे दुःख शोका न घ्यावे |" मी मी करून दुःख अंगावर ओढावून घेऊ नये. "पुढे काय होईल ते ते पाहावे | बरे वोखटे सर्व साहूनी न्यावें ||" आपल्या वाट्याला जे जे येईल ते सोसावे. हे कोण सांगतो कर्मयोग्यांचा राजा श्री समर्थ रामदास स्वामी म्हणत आहे. कर्माचं बंधन हे असे आहे.

No comments:

Post a Comment