TechRepublic Blogs

Sunday, April 28, 2024

नामस्मरण

 पू.श्री.गुरुदेवांच्या मुलाचे डिसेंबर १९१६ मध्ये निधन झाले. त्यानंतर १९१८ मध्ये जगामध्ये ईनफ्लुएनझा साथीचा ताप या  साथीने उच्छ्याद मांडला होता. त्यावेळी गुरूदेवांचा मुक्काम पुणे येथे होता. पुण्याला पण या साथीच्या तापाने वेढले होते. 

त्या साथीत गुरुदेवांच्या पत्नीचे सप्टेंबर १९१८ मध्ये निधन झाले याचे गुरुदेवांना फार दुःख झाले. प्रसंगानुरूप  श्री.गुरुदेव एका गुरुबंधुला म्हणाले *" ती सद्गतीला गेली असे मला दिसले. तिला वाचविता आले असते. तसा शब्द देवाजवळ टाकला असता तर परत फिरला नसता इतकी किंमत माझ्या शब्दाला देवाजवळ होती. पण तसा शब्द टाकणं योग्य नव्हे. देव करतो ते सर्व कल्याणकारी आहे अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. म्हणू मी तुझ्या इच्छेला येईल तेच होऊ दे. 

अशी प्रार्थना केली."* पुढे  पत्नीच्या निधनानंतर तीनच आठवड्यांनी ऑक्टोबर १९१८ मध्ये त्याच साथीच्या रोगात गुरुदेवांच्या आईंना देवाज्ञा झाली. त्यांच्या आईचे निर्याण झाले तेव्हा गुरुदेव दासबोधातील १२ वा समास वाचीत होते. त्यानंतर झालेल्या परमार्थ बैठकीत (सिटींग) मध्ये गुरुदेव म्हणाले *आई मृत्युशय्येवर पडली असता मी देवाची प्रार्थना केली  "देवा तुझ्या मनात असेल तर तिला राहू दे , नसेल तर घेऊन जा. माझी आई उध्दरून गेली. तिच्या चितेवर शेष (नाग) नाचताना पाहिला. शेवटपर्यंत ती नामस्मरणात होती." 

पुढे ते एकदा आई संदर्भात म्हणाले " एकवेळ देव मिळवणं सोप आहे पण आई मिळणं फार कठीण आहे."* *"देवाच्या इच्छेने व्हावे "* या निरपेक्ष वृत्तीचा स्वीकार त्यांनी केला होता. या तीन आघाता नंतर श्री.गुरुदेव एकाकी झाले. या काळात गुरूदेवांचा रोजचा कट्टाचा नेम सात तासांचा झाला होता. तो अधिक व्याकुळतेने व भावपूर्णतेने चालू होता.

No comments:

Post a Comment