" आठव तो ब्रह्म | नाठव तो भव - भ्रम || याबद्दल श्री.गुरुदेव रानडे म्हणाले "साक्षात्कारी सद्गुरुंकडून नाम मिळते ते सबीज म्हणजे आत्मशक्तियुक्त असते. ते आत्मतत्त्व असते. ती शक्ती त्या अक्षराच्या मौनाने केलेल्या उच्चारात असते.सद्गुरु त्या अक्षरात आत्मशक्ती घालतात. तसे सामर्थ्य त्यांना असते. असे शक्तियुक्त नाम जे देऊ शकतात तेच सद्गुरुपदाचे अधिकारी होत. "सत्पुरुषाच्या जीवनाचे चरित्राचे निरीक्षण करावे " असे श्री गुरुदेव बरेच वेळा सांगत असत. त्यांनी स्वतः श्री.भाऊसाहेब महाराज उमदिकार व श्री.अंबुराव महाराज यांच्या जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले होते व त्या निरिक्षणाचात्यांना बराच पारमार्थिक लाभ झाला होता. "सत्संग म्हणजे थोर संतांची संगत अशी साहजिकच समजूत होते. असे थोर संत नेहमी कसे व कोठे मिळणार ? त्यामुळे सत्संगती ही अशक्यप्राय वाटते." असे श्री.काकासाहेब यांनी विचारले. त्यावर श्री.गुरुदेव म्हणाले " थोर साक्षात्कारी पुरुष असा येथे संत या शब्दाचा अर्थ अभिप्रेत नाही. भक्ती करणारी, नामस्मरण करणारी, सज्जन व शीलवान माणसे म्हणजे संत . त्यांची संगती मिळणे शक्य आहे व ती जोडली पाहिजे. महान साक्षात्कारी पुरुष विरळा"
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment