चिंतन
श्रीराम,
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ एकदा तरी येते जेव्हा ती खुप निराश होते आणि नैराश्यात जाते. काही दुःख किंवा एखाद्या वाईट घटनेमुळे काही काळ असे होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु जर ही परिस्थिती बरेच दिवस अशीच राहिली तर ते नैराश्याचे लक्षण असू शकते. वेळेवर नियंत्रण न आणल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मग हे टाळण्यासाठी काय करावे? तर नियमित झोप घ्यावी. सकारात्मक बोलायचे, वाचायचे, ३०ते४० मिनिटे व्यायाम करायचा, ध्यान, नामस्मरण करायचे. लोकांना मदत करावी. सतत उद्योगात गुंतलेले असावे. हे झाले डाॅक्टरी सल्ले.
हेच आपल्याला संत हरिपाठातून आणि मनाच्या श्लोकातून सांगतात. तसेच कायम संतांच्या संगतीत रहा असे सांगतात म्हणजे आपला संसार सोडून संन्यास घेऊन त्यांच्या संगतीत रहा असे नाही तर संतांच्या विचारांच्या संगतीत राहता आले पाहिजे.
सदा संगती सज्जनाची करावी.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment