TechRepublic Blogs

Saturday, April 6, 2024

रामरंगी रंगले

 *मन हो रामरंगी रंगले*

*सौ. विनयाताई देसाई*

संकलन आनंद पाटील 


*भक्त, भक्ती आणि भक्तिभाव याची उकल त्याच भक्तिभावाने करून आपल्यापर्यंत* *पोहचवण्याचा प्रयत्न करते आहे. आपण सर्वसामान्य प्रापंचिक माणसे आहोत, पण पूर्वपुण्याईने नाम, भक्ती जाणून घेण्याचा* *प्रयत्न तरी करत आहोत. निस्सिम भक्त बनायचं असेल तर भक्त आणि त्याची भक्ती कशी हवी? यावर स्वामी स्वरुपानंद सांगतात, न होती भक्त, उच्चारुन नाम पोटी काम, क्रोध असे जरी, न होती ते भक्त, घालोनिया माळा भक्तीचा जिव्हाळा नसे जरी, स्वामी म्हणे व्यर्थ, पूजा घंटानाद भेटे ना* *गोविंद, भक्तीवीण | असे भक्तीनं सारे सूत्र हवे आणि भक्त पण खरे तळमळीचे हवेत. तरच मन रामरंगी रंगून जाईल यात शंकाच नाही.*


*भगवंताची भक्ती करणारे आपण सारे आहोत. प्रापंचिक आहोत, गुण दोषाने युक्त आहोत. आपल्यातील उणीवा,जाणिवा, गुण दोष*

*हे सगळं आपल्याला ठाऊक असतं. जसे आहोत तसे भगवंता ठाई, गुरुपायी परमेश्वर चरणी नतमस्तक होणं याचं नांव भक्ती. असे संपूर्ण शरणागत, समर्पित जगणं म्हणजे भक्तिमय होऊन जगणं. एक वेगळी समाधानाची अनुभूती जगताना यायला लागते. अशी सुंदर अवस्था रामाप्रती, नामाप्रती असलेल्या संपूर्ण श्रद्धाभाव असल्याने निर्माण होते. त्याही पुढे जाऊन जसा आपल्या अंतरंगात तो आहे तसा समोरच्यामध्ये*

*पण तोच आहे याची जाणीव असणं ही भक्तीची परिपूर्ण अवस्था.*


*भक्ती म्हणजे आतून होणारी प्रगती. आंतरीक इच्छा, प्रेरणा,वाटचाल आपल्या ध्येयप्राप्तीसाठी होत असेल तर तीच भक्ती. आपलं ध्येय साध्य काय करायचंय हे निश्चित समजलं की जी निश्चित निर्भय अवस्था प्राप्त होते ती भक्ती. भक्तीमधील शक्ती म्हणजे निर्भयता. सतत शंका, भय, अस्वस्थता म्हणजे भक्तीमय अवस्थेला आपण पूर्णपणे पोहोचलो नाही हे ज्याचे त्याने लक्षात घ्यायला हवे. भक्त आपल्या भक्तीभावाने इतका रममाण होऊन गेला पाहिजे की क्षुल्ल्लक मान,अपमान, जीवनातले चढउतार, बरेवाईट प्रसंग या बाबींचा परिणाम*

*रोजच्या जीवनावर व्हायला नको. अशी समतोल अवस्था प्राप्त झाली की ती भक्तीमय अवस्था, गीतेच्या बाराव्या अध्यायात भगवंताने सुंदर रितीने समजावले आहे. तसा भक्त होण्याचा प्रयत्न करू या. संकलन आनंद पाटील*

No comments:

Post a Comment