चिंतन
श्रीराम,
अकस्मात होणार होऊन जाते... जीवन हे सातत्याने घटनाप्रधान आहे. ते क्षणभंगूरही आहे. जे जे दृश्य रुपाने साकारते त्याचा नाश अटळ आहे म्हणूनच ह्या वास्तव्य भूमीला मृत्यू लोक म्हणतात.
अगदी सान्निध्यात असूनही आपल्या प्रिय व्यक्तीच्या आकस्मिक निधनाचा पुसटसा पूर्वसंकेत सहसा कोणालाही मिळत नाही आणि मृत्यूचा स्वीकार करणे अत्यंत कठीण जाते. हे सर्वांनाच कळते मात्र ते सहजासहजी वळत नाही, हीच अगम्य अशी माया!
संथ पाण्यावर नाव ही तरंगणारच. वादळाचे थैमान चालू असताना लाटांच्या धिंगाण्याचा सामना करीत आपली नाव टिकून तरंगत ठेवणे हे फक्त गुरुकृपेने आणि साधनेने जमते. अनावश्यक ते टाळावे व सुयोग्य तेच करावे.
जे उचित तेच आकळावे |ऐसा अनुभव होय निका |
तेव्हा समजावे ही ईशकृपा आहे!!
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment