शरणांगती मध्ये प्रार्थनेला फार महत्व आहे. मोहाला टक्कर देण्याची शक्ती माणसाला नसते. हतबल होऊन केलेल्या प्रार्थनेने जीवाच्या ठिकाणी अध्यात्मिक शक्ती जागी होते. योगशास्त्रामध्ये त्या शक्तीला कुंडलिनी म्हणतात. " मी आता ईश्वराचा झालो" हा मनाचा निश्चय होणे ही शक्ती झाल्याची खूण आहे. शक्तीने जीव ईश्वराशी जडला म्हणजे त्या जडण्या मध्ये एक ईश्वर आपल्याला प्रेमाने जवळ करील ही खात्री असते. दोन तो जन्मभर आपला सांभाळ करील ही श्रद्धा असते. याचे दोन दृश्य परिणाम अनुभवास येतातयेतात.
पहिला आतापर्यंत आपल्याकडून जे जे घडले ते सारे माणूस ईश्वराच्या चरणी अर्पण करतो. त्या अर्पणामुळे माणसाचे मागचे सर्व कर्मसंचित ईश्वराच्या स्पर्शाने बलहीन होते. जीवाची पाटी कोरी होते. अशा जीवाला ईश्वर अथवा सद्गुरू आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो.
दुसरा मागच्या कर्माचे ओझे ईश्वराच्या चरणी ठेवल्या कारणाने जीव आणि ईश्वर यांच्यात चालत आलेला विसंवाद एकदम नाहीस होतो. मग जीवाला ईश्वराच्या सहवासाची तहान लागते त्याच्या सान्निध्याची किंमत कळू लागते. म्हणून जीव ईश्वराच्या अनुसंधानाचा मार्ग व मार्गदर्शक शोधतो.
No comments:
Post a Comment