*🌹🙏🏻 श्रीराम समर्थ 🙏🏻🌹*
*🌺🙏🏻नामप्रभात🙏🏻🌺*
*एकदा ती. तात्यासाहेब केतकरांना एका भक्ताने विचारले , " श्रींच्या सहवासात आपण इतके वर्ष होता तेव्हा त्यांच्याबद्दल आपण काहीतरी सांगा." त्यावर ती . तात्यासाहेब लिहीतात , श्रीमहाराज ज्यास एकदा भेटले त्यास त्यांची ओढ लागल्याशिवाय राहत नाही . श्रींनी चमत्काराला महत्त्व दिले नाही . कोणी एखाद्याने त्यांच्याबद्दल काही सांगितले तर दुसरे काही बोलणे काढून ते बोलू देत नसत . श्रीमहाराज मूर्तिमंत चमत्कारी होते व आहेत . त्यांची प्रत्येक गोष्ट वरवर दिसण्यात इतकी स्वाभाविक दिसे , परंतु ती वेळ होऊन गेल्यावर ती कशी काय झाली याचे आश्चर्यच वाटे .* *माझी अशी खात्री आहे की असा एकही मनुष्य नाही की जो श्रींच्या सहवासात राहिला आहे व त्यास मनोमन साक्ष पटली नसेल !* *प्रत्यक्ष ज्यास अनुभव आला आहे अशा मंडळींनी स्वतःबद्दलचे अनुभव मला सांगितले ते लिहायचे म्हटले तर लांबण होईल .
श्रींस श्रींस खरोखर जे आवडत नव्हते ते मी लिहावे हे बरे नाही. श्रींचा मोठ्यातला मोठा चमत्कार जर पाहायचा असेल तर विषयाच्या आसक्तीत असलेल्या लाखो जीवांस श्रीरामनामाकडे वळविले यासारखा सार्वजनिक चमत्कार दुसरा कोणता आहे ? त्यांचे उपकार अगणित आहेत .* *त्यांची परत फेड करायची असेल तर त्यांचे होऊन राहणे व आज्ञेप्रमाणे वागणे . आमचे बाबतीत त्यांनी व्यवहार सांभाळला नाही . प्रेम राखले . संकटे सर्व प्रकारची आली पण त्यांच्या कृपाछत्राखाली झळ मुळीच लागली नाही . श्रीमहाराज मूर्तीमंत दयाळू होते . श्रींच्या कृपेने व आशीर्वादाने आम्ही आजचा दिवस उपभोगीत आहोत यापेक्षा जास्त काय लिहावे ! '*
*संदर्भ - सहज बोलणे हितउपदेश*
*लेखक - गो . सी . गोखले*
No comments:
Post a Comment